Digital Fraud : डिजिटल फसवणूक झाल्यास आता आरबीआयकडून मिळणार नुकसान भरपाई

- आरबीआयचा नवीन मसुदा आराखडा तयार; ६ एप्रिलपर्यंत मागवल्या सूचना


भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये वाढत असलेल्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी नवीन मसुदा आराखडा जाहीर केला आहे. ‘डिजिटल व्यवहारांमधील ग्राहकांची जबाबदारी’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या मसुद्यानुसार, डिजिटल फसवणूक झाल्यास ग्राहकांना आता २५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्रस्तावित नियमांचा उद्देश ग्राहकांचा विश्वास वाढवणे, तक्रारींचे निवारण जलद करणे आणि डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित बनवणे हा आहे.


आराखड्यानुसार, जर एखाद्या ग्राहकासोबत डिजिटल फसवणूक झाली आणि त्याने वेळेवर बँकेला किंवा संबंधित संस्थेला त्याची माहिती दिली, तर त्याला झालेल्या नुकसानाच्या ८५ टक्के रक्कम किंवा कमाल २५,००० रुपये इतकी भरपाई मिळू शकते. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीची १०,००० रुपयांची फसवणूक झाली असेल, तर ८५ टक्के प्रमाणानुसार त्याला ८,५०० रुपये परत मिळू शकतात. त्याचप्रमाणे ४०,००० रुपयांची फसवणूक झाल्यास ८५ टक्के रक्कम ३४,००० रुपये होते, परंतु प्रस्तावित कमाल मर्यादा २५,००० रुपये असल्यामुळे ग्राहकाला २५,०००रुपये इतकीच भरपाई मिळेल. ही योजना प्रामुख्याने ५०,००० रुपयांपर्यंतच्या फसवणूक प्रकरणांसाठी लागू करण्याचा प्रस्ताव आहे.


रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले की सध्या लागू असलेले नियम २०१७ मध्ये तयार करण्यात आले होते. मागील सात ते आठ वर्षांत डिजिटल बँकिंग, यूपीआय व्यवहार आणि ऑनलाईन पेमेंटच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्याचबरोबर फसवणुकीच्या नव्या पद्धतीही वाढल्या आहेत. त्यामुळे जुन्या नियमांचा आवाका वाढवून सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक फसवणुकीचा समावेश करण्याची गरज निर्माण झाली आहे.


या मसुद्याचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे बँकांकडून तक्रारींच्या निवारणासाठी लागणारा वेळ कमी करणे. अनेकदा फसवणूक झाल्यानंतर ग्राहकांना पैसे परत मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे भविष्यात बँका आणि वित्तीय संस्थांनी तक्रारींवर जलद कारवाई करावी आणि ग्राहकांना वेळेत दिलासा द्यावा, असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे.


हा मसुदा सध्या सार्वजनिक चर्चेसाठी खुला ठेवण्यात आला असून बँका, वित्तीय संस्था तसेच सामान्य नागरिकांना त्यावर आपली मते आणि सूचना देण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुक व्यक्ती ६ एप्रिल २०२६ पर्यंत ई-मेलद्वारे आपल्या सूचना पाठवू शकतात. मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे अंतिम नियम तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला जाईल.

Comments
Add Comment

Silver Price : चांदी आणखी महाग होणार? सरकारच्या मोठ्या निर्णयानंतर दरवाढीची शक्यता

- गुंतवणूकदारांचे लक्ष बाजाराकडे मुंबई : तुम्ही चांदीमध्ये (Silver Price) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात किंवा

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद मुंबई :

Mexico Puebla Shooting : मेक्सिकोच्या प्युएब्लामध्ये गोळीबार; एका अल्पवयीन मुलासह १० जणांचा मृत्यू

मेक्सिको : मेक्सिकोमधील पुएब्ला राज्यात झालेल्या भीषण सशस्त्र हल्ल्यात (Mexico Puebla Shooting) किमान १० जणांचा मृत्यू झाला