आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. भारताने इंग्लंडचा, तर न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या दोन संघापैकी कोणता संघ वर्ल्ड कप उंचवणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ मैदानावर उतरताच एक मोठा इतिहास रचणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येकी १४ वेळा फायनल खेळली आहे. या आयसीसी स्पर्धांमध्ये वनडे वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा समावेश आहे. रविवारी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर तो हा विक्रम मोडणार आहे. भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमधील आपला १५ वा अंतिम सामना खेळणार आहे. असे असले तरी ऑस्ट्रेलियाने १४ पैकी १० फायनल जिंकल्या आहेत. तर भारताने १७ पैकी ७ फायनल जिंकल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२ ची फायनल ही पावसामुळे रद्द करण्यात आली होती.


आयसीसी फायनलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारे संघ




  1. ऑस्ट्रेलिया - १४ सामने  - १० विजय

  2. भारत - १४ सामने - ७ विजय

  3. वेस्ट इंडिज - ८ सामने ५ विजय

  4. इंग्लंड - ९ सामने ३ विजय

  5. श्रीलंका - ७ सामने ३ विजय

  6. न्यूझीलंड - ७ सामने २ विजय

  7. पाकिस्तान - ६ सामने ३ विजय

  8. दक्षिण अफ्रिका - ३ सामने २ विजय


आयसीसी टूर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताचे विजय




  1. वनडे विश्वचषक १९८३: भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला.

  2. चॅम्पियन्स ट्रॉफी २००२: भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते.

  3. टी-२० विश्वचषक २००७: भारताने पाकिस्तानला मात दिली.

  4. वनडे विश्वचषक २०११: भारताने श्रीलंकेचा पराभव केला.

  5. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३: भारताने इंग्लंडला धूळ चारली.

  6. टी-२० विश्वचषक २०२४: भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवले.

  7. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: भारताने न्यूझीलंडचा पराभव केला.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : कॅनडातील वणव्यांचा धूर आणि स्पेनच्या सराव सत्रावर परिणाम

कॅनडातील वणव्यांमुळे निर्माण झालेला विषारी धूर सध्या उत्तर अमेरिकेच्या अनेक भागांत पसरला आहे. या गंभीर हवामान

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)