ठाण्यात महाविकास आघाडी फुटली!

काँग्रेसचा स्वबळाचा नारा


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून समाधान न झाल्याने काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि मनसे यांच्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावरून मतभेद वाढले.


काँग्रेसने ३५ जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसला केवळ पाच ते सहा जागा देण्यास तयार होते. हा प्रस्ताव अमान्य करत ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आघाडीतून बाहेर पडण्याची आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
चव्हाण म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, ज्यावेळी आम्ही आघाडीसोबत उभे होतो, तेव्हा आज जवळचे मानले जाणारे काही पक्ष विरोधकांसोबत होते. आता काँग्रेसकडे सर्व प्रभागांसाठी सक्षम उमेदवार असून, सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील.” वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.


दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, “विक्रांत चव्हाण यांनी नेमकी काय घोषणा केली याची माहिती घेतली जाईल. काही गैरसमज असतील तर आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.


काँग्रेसच्या या निर्णयामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट ढासळली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे राहणार की आघाडीतील फूट त्यांना फायदेशीर ठरणार, हे काळकच ठरवेल.

Comments
Add Comment

गॅस संकटाच्या नावाखाली संजय राऊतांचे घबराट निर्माण करण्याचे हीन राजकारण; नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : इराण इस्राईल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित

पुरावे द्या, गैरकारभार करणाऱ्या मासेमारी संस्थांवर कारवाई करू

मुंबई : "मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार असेल, तर पुरावे द्या, संबंधित

लवकरच उभारले जाणार ‘मराठी भाषा भवन’; मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने विधानपरिषदेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिच्या

ऐतिहासिक 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक' आज विधानसभेत!

प्रलोभने, सक्तीच्या धर्मांतराला बसणार चाप; महायुती सरकारचे निर्णायक पाऊल मुंबई : राज्यात गेल्या काही काळापासून

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि