ठाण्यात महाविकास आघाडी फुटली!

काँग्रेसचा स्वबळाचा नारा


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून समाधान न झाल्याने काँग्रेस पक्षाने आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


निवडणूक १५ जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर आहे. निवडणुकीसाठी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि मनसे यांच्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटपावरून मतभेद वाढले.


काँग्रेसने ३५ जागांची मागणी केली होती. मात्र, आघाडीतील इतर पक्ष काँग्रेसला केवळ पाच ते सहा जागा देण्यास तयार होते. हा प्रस्ताव अमान्य करत ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आघाडीतून बाहेर पडण्याची आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
चव्हाण म्हणाले, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम केले. मात्र, ज्यावेळी आम्ही आघाडीसोबत उभे होतो, तेव्हा आज जवळचे मानले जाणारे काही पक्ष विरोधकांसोबत होते. आता काँग्रेसकडे सर्व प्रभागांसाठी सक्षम उमेदवार असून, सर्व जागांवर उमेदवार उभे केले जातील.” वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.


दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, “विक्रांत चव्हाण यांनी नेमकी काय घोषणा केली याची माहिती घेतली जाईल. काही गैरसमज असतील तर आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू,” असे सांगितले.


काँग्रेसच्या या निर्णयामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट ढासळली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे राहणार की आघाडीतील फूट त्यांना फायदेशीर ठरणार, हे काळकच ठरवेल.

Comments
Add Comment

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षा होणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला

Sunil Tatkare: विलीनीकरणाबाबत प्रस्ताव आल्यास भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य - सुनील तटकरे

शशिकांत शिंदे यांच्या लेखाचा घेतला समाचार मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य

Devendra Fadnavis: तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रासाठी वाकायामा प्रांताशी सहकार्य अधिक दृढ करणार - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा

ISRO Science Trip: अंतराळ संशोधन क्षेत्रात ग्रामीण विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इस्रो विज्ञान सहल

- विज्ञान प्रेरणा अभियानांतर्गत आश्रमशाळेतील १०० विद्यार्थी सहलीत सहभागी होणार मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण

NCP Merger: शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे...

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असतानाच,

Narhari Zirwal: "चौकशीत नाव आलं तर..."; ACB च्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या