आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासन अत्यंत सकारात्मक आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीसाठी आणि वेतनाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.


मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या 'आपले सरकार सेवा केंद्र' ब्लॉक व्यवस्थापक कर्मचारी संघटनेच्या बैठकीत राज्यमंत्री कदम बोलत होते. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स्नेहल अडसूळ, सहायक कक्ष अधिकारी स्नेहा खोत आणि संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कामातील अडचणी आणि प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले.


राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, संबंधित कंत्राटी कंपन्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने अधिकृत नियुक्ती आदेश (Appointment Orders) देणे अनिवार्य आहे. नियुक्ती पत्र नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडण्याची भीती असते, तसेच त्यांच्या वेतनासंदर्भातही मोठ्या अडचणी निर्माण होतात. या तांत्रिक त्रुटी दूर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या सेवेत सातत्य राहील आणि त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून, कर्मचाऱ्यांच्या हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात येईल. व्यवस्थापकांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावून त्यांना न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.


तालुका आणि जिल्हा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना संगणक तज्ञ आणि ब्लॉक व्यवस्थापक महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामीण भागातील जनतेला डिजिटल सेवा मिळवून देण्यासाठी हा घटक कणा असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी