'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि सराफ व्यावसायिकांच्या समस्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. या व्यावसायिकांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर होणारी अन्यायकारक कारवाई रोखण्यासाठी गृह विभाग कटिबद्ध असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र कक्ष (Special Cell) स्थापन करण्याबाबत आढावा घेतला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानपरिषदेत केली.



लघुउद्योगाचा दर्जा आणि कर्जसुविधा



विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री योगेश कदम बोलत होते. सांगली आणि साताऱ्यातील हजारो कुटुंबे पिढ्यानपिढ्या परराज्यात जाऊन रिफायनरी आणि सराफी व्यवसायात कार्यरत आहेत. मात्र, या व्यवसायाला अद्याप लघुउद्योगाचा दर्जा नसल्याने त्यांना बँकांकडून कर्ज मिळवताना आणि सरकारी योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांसोबत विशेष बैठक आयोजित केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.



पोलिस कारवाईसाठी 'SOP' चे कडक पालन



सराफ व्यावसायिकांवर होणाऱ्या पोलिसांच्या कारवाईबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, सराफ आणि गलाई बांधवांना नाहक त्रास होऊ नये यासाठी गृह विभागाने १४ मार्च २०२४ रोजीच विशेष मार्गदर्शक तत्वे (SOP) जारी केली आहेत. या नियमावलीनुसार, कोणत्याही व्यावसायिकावर कारवाई करण्यापूर्वी त्याला रीतसर पूर्वसूचना (Notice) देणे अनिवार्य आहे. केवळ संशयावरून कोणतीही बळजबरीची कारवाई करता येणार नाही. तसेच, चौकशीची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असावी आणि या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने या नियमांचे उल्लंघन करून किंवा अधिकारांचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित अधिकाऱ्यावर शासन स्तरावरून कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


व्यावसायिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 'न्याय दक्षता समिती' स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये या समित्या कार्यान्वित झाल्या असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील ३० दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

‘समग्र शिक्षा’ अभियानाच्या भविष्यातील आराखड्याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविले; महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची माहिती

मुंबई: ‘समग्र शिक्षा’ ही केंद्र शासनाची योजना देशात सर्वत्र राबवली जाते. समग्र शिक्षा योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत

Akola Crime News : अकोला हादरलं! 'धुरंधर' सिनेमा पाहून आले अन् दिवसाढवळ्या तिघांवर सपासप वार

अकोला : नांदेडमधील तिहेरी हत्याकांड ताजे असतानाच आता अकोला शहरातही तशीच धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कौलखेड

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नागपूर : वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे

Pune Railway Station : पुणे - रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट

पुणे : पुणे स्थानकाच्या मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये सहा नवीन फलाट होणार आहेत. फलाट क्रमांक ७ ते १२ असे

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक - कुंभमेळा विषयक विकास कामांची राजेश अग्रवाल यांच्याकडून पाहणी

वेळेत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना दिल्या सूचना नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर

पाणी तुंबणाऱ्या २२७ पैकी १२० ठिकाणी सोमवारपासून कामे सुरू - पुणे महापौर

पुणे : पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ