पुरावे द्या, गैरकारभार करणाऱ्या मासेमारी संस्थांवर कारवाई करू

मुंबई : "मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थांमध्ये गैरप्रकार होत असल्याची तक्रार असेल, तर पुरावे द्या, संबंधित संस्थांवर कारवाई केली जाईल," असे आश्वासन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले. नांदेड जिल्ह्यातील मत्स्य संस्थांमधील कथित गैरव्यवहाराबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.


लोहा तालुक्यातील 'जय मल्हार', 'मल्हारी मार्तंड', 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' आणि 'राजमाता अहिल्यादेवी' या चार मत्स्य संस्थांची नोंदणी एकाच व्यक्तीने केल्याचा आणि त्यात कोणतेही क्रियाशील सभासद नसल्याचा आरोप आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लक्षवेधीद्वारे केला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासनाचे लाखो रुपये उकळले जात असल्याकडे त्यांनी म्हटले होते.


या प्रकरणावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, केवळ आरोपांच्या आधारे कोणत्याही संस्थेवर थेट कारवाई करता येत नाही. आमच्याकडे पुरावे न देता एखाद्या संस्थेविरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा ठेवणेही योग्य नाही. पुरावे नसताना कोणत्या आधारावर कारवाई करायची? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम १२० अंतर्गत अपील करण्याची तसेच तक्रार दाखल करण्याची तरतूद आहे. सदस्यांना त्या तरतुदीचा वापर करून संस्थेविरोधात चौकशीची मागणी करता येते. त्या अनुषंगाने आवश्यक पुरावे, कागदपत्रे आणि पत्रव्यवहार शासनाकडे सादर केल्यास त्या आधारे चौकशी सुरू करता येईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.


परस्पर विरोधी भूमिका


एका बाजूला मत्स्य उत्पादन वाढले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; तर दुसऱ्या बाजूला मत्स्य उत्पादनाशी संबंधित संस्था बंद करण्याची मागणी केली जाते. या दोन भूमिका परस्परविरोधी असल्याचेही मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले. त्यामुळे आमदार चिखलीकर यांनी या संस्थांच्या गैरव्यवहाराचे ठोस पुरावे असतील, तर ते शासनाला सादर करावेत. योग्य पुरावे मिळाल्यास आम्ही निश्चितपणे सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, असे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन म्हणजे अराजकतेचे प्रकटीकरण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; 'संविधानविरोधी कृत्यांनी त्यांचा खरा चेहरा उघड केला' मुंबई : "राजधानी

IND vs AFG : गिलचा मुल्लानपूरमध्ये विक्रमांचा पाऊस; धोनी-गांगुलीला मागे टाकत कर्णधार म्हणून 1000 धावा पूर्ण

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार शतक झळकावत अनेक विक्रम

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

अलिबाग : गेल्या पाच वर्षांत भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Devendra Fadnavis : इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर

मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या