गॅस संकटाच्या नावाखाली संजय राऊतांचे घबराट निर्माण करण्याचे हीन राजकारण; नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई : इराण इस्राईल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित असल्याचे पाहवत नसल्याने संजय राऊत,उबाठा गट, काँग्रेस हे गॅस व इंधन संकटाचा बागुलबुवा उभा करून त्याच्या नावाखाली सामान्य जनतेमध्ये घबराट निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण खेळत असल्याचा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात ५०  लाख गॅस सिलेंडर रोज पुरवले जात आहेत, होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची आयात सुरळीत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. इंधन आयातीसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब, इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात वाढ करणे यासारख्या उपाययोजना करून केंद्र सरकार युद्धपातळीवर कामाला लागले असताना राऊत आणि काँग्रेस गॅस टंचाईच्या नावाखाली जनतेच्या मनात भीती निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.


यावेळी  बन म्हणाले की, राज्यात गॅस टंचाई नाही, नागरिकांना बुकिंग केल्यावर दोन दिवसांत घरगुती गॅस सिलेंडर मिळत असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जनतेत घबराट निर्माण करण्यासाठी २०१२ साली काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्यांचे फोटो व्हायरल करण्याची नामुष्की उबाठा गट आणि काँग्रेसवर ओढवली असल्याचा घणाघातही त्यांनी केला. सर्व नागरिकांना गॅस पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि त्या जबाबदारीचे भान सरकारला असून ही जबाबदारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत निभावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार करत आहे.



संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताकडे वाकड्या नजरेने बघायची कुणाची हिंमत होत नाही मात्र दुर्दैवानं संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात अशी टीका बन यांनी केली. इराण आणि इस्राईल युद्धाचा फटका आपल्या देशाला बसायला हवा अशी राऊतांची इच्छा आहे. गॅस, इंधन, उर्जा संकटाच्या नावाखाली देशात अराजक पसरण्याचा घाणेरडा घाट राऊतांनी घातला आहे. परंतु राऊतांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण देशातील १४० कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

Mahesh Dixit Appointed IB Chief : महेश दीक्षित यांची आयबी (IB) प्रमुखपदी नियुक्ती; कोण आहेत हे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्त्वाची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau-IB) च्या

FIFA World Cup 2026 Neymar : ९८१ दिवसांनंतर ब्राझीलसाठी मैदानात उतरला नेमार, चाहत्यांचा जल्लोष

इंग्लंड : ब्राझील विरुद्ध स्कॉटलंड (Brazil vs Scotland) सामन्यात तब्बल ९८१ दिवसांनंतर स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar) याने

Women's T20 World Cup : शेफाली वर्माची दमदार अर्धशतकी खेळी; भारताने बांगलादेशला ५ गडी राखून हरवलं

इंग्लंड : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने

India vs Ireland T20I : महिला विश्वचषकामुळे भारत-आयर्लंड सामन्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या कसं असेल नवीन वेळापत्रक?

मुंबई : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) मालिकेपूर्वी मोठा निर्णय

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि