ठाण्यात घराणेशाहीचा वाद चिघळला

खा. नरेश म्हस्केंच्या मुलाच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घराणेशाहीचा वाद उग्र होताना दिसतो आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुरू केलेली नाराजी आता थेट खासदार नरेश म्हस्के यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, खासदार होण्यापूर्वी नगरसेवक म्हणून ज्या प्रभागाचे नरेश म्हस्के प्रतिनिधित्व करत होते, त्यातून आता त्यांचा मुलगा आशुतोष उमेदवारीसाठी तयार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र शिवसेनेतील (शिंदे गट)कार्यकर्त्यांनी याला उघड विरोध असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे.


काही दिवसांपूर्वी मनोरमानगर भागातदेखील भोईर कुटुंबाविरोधात बंड उभे राहिले होते. शिंदे गटाने विरोध करणाऱ्या शाखाप्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई केली होती. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी महिला जिल्हा संघटक पदाचा राजीनामा देऊन नाराजीची ठिणगी पेटवली, जी आता अनेक प्रभागांमध्ये पसरू लागली आहे. शनिवारी रात्री कोपरी आनंदनगर येथेही अशाच प्रकारची घटना घडल्याने खासदार नरेश म्हस्के यांना आव्हान उभे राहिले आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच