दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी


मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना त्यांना मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश दिल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच काही शिक्षकांनी आपल्या संस्थाचालकांकडे व महापालिका प्रशासनाकडे आजारी असल्याचे कागदपत्र सादर केलेले असतानाही त्यांनाही या संदर्भातले आदेश आल्याने यावर आयोगाने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.मुंबई आणि परिसरातील शिक्षकांना महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत ‘बीएलओ’ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी दिव्यांग आणि आजारी शिक्षकांचा समावेश आहेत. त्यांना या निवडणूक कामकाजातून सूट द्यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.दरम्यान, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांमध्येही दिव्यांग आणि आजारी असलेल्या शिक्षकांना तसेच महिला शिक्षकांना निवडणुकीचे कामे देऊ नये, अशी मागणी यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेकडून करण्यात आली होती; त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये काही शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार