दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी


मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना त्यांना मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश दिल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच काही शिक्षकांनी आपल्या संस्थाचालकांकडे व महापालिका प्रशासनाकडे आजारी असल्याचे कागदपत्र सादर केलेले असतानाही त्यांनाही या संदर्भातले आदेश आल्याने यावर आयोगाने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.मुंबई आणि परिसरातील शिक्षकांना महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत ‘बीएलओ’ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी दिव्यांग आणि आजारी शिक्षकांचा समावेश आहेत. त्यांना या निवडणूक कामकाजातून सूट द्यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.दरम्यान, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांमध्येही दिव्यांग आणि आजारी असलेल्या शिक्षकांना तसेच महिला शिक्षकांना निवडणुकीचे कामे देऊ नये, अशी मागणी यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेकडून करण्यात आली होती; त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये काही शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर