अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर आरोपांत अटक झाली आहे. या प्रकरणात विशेष तपास पथक तपास करत आहे. याच अशोक खरातची पाद्मपूजा करताना आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरताना तसेच अनेक कार्यक्रमात खरात सोबत वावरताना रुपाली चाकणकरांचे फोटो समोर आले. एका ट्रस्टमध्ये खरात आणि रुपाली चाकणकर हे दोघेही ट्रस्टी असल्याची माहिती समोर आली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे.





महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागल्यामुळे त्यांना अशोक खरात प्रकरण भोवल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राजीनाम्याबाबत रुपाली चाकणकर यांनी एक्स पोस्ट करून माहिती दिली आहे.


'खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे'; अशी एक्स पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे.


Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री