ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला, असून आता प्रकल्पाच्या मुख्य टनलिंग ड्राइव्हच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईच्या भूमिगत गतिशील जाळे विस्तारीकरणाच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.


मुंबईच्या किनारी भूभागातील मिश्र व खडतर भूस्तरासाठी अचूक व सुरक्षित खोदकाम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या स्लरी-शील्ड टनल बोरिंग मशीनने (टीबीएम) नुकताच हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यानंतर काही दिवसांतच ७० मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण करून जलद गतीने काम पुढे नेले जात आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ३ डिसेंबर २०२५ रोजी या टीबीएमचे लॉन्चिंग करण्यात आले होते. या प्रकल्पाच्या अंतर्गत अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर करून दोन बोगदे उभारले जाणार असून, त्यांची एकूण लांबी जवळपास ७ किमी आहे. त्यापैकी सध्या सुरू असलेला पहिला बोगदा हा ३.४५ किमी लांबीचा असून त्याची खोली जमिनीच्या पृष्ठभागापासून कमाल ५२ मीटर असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या बळावर हा बोगदा पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन तसेच त्यांच्याही खाली असलेल्या मेट्रो ३ लाईनच्या खालून जाणार आहे.


प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास केवळ ५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे पूर्व-पश्चिम दळणवळण सुलभ होईल, तसेच कोस्टल रोड आणि अटल सेतू यांच्याशी थेट जोडणी निर्माण होईल. परिणामी वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि प्रदूषण यामध्ये लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. टीबीएमच्या लॉन्चिंगनंतर प्रकल्पाने अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यामध्ये टीबीएमच्या बॅकअप प्रणालीचे घटक खाली उतरवून त्यांचे टीबीएम शील्डशी संयोजन, तसेच प्रारंभिक टनलिंग ड्राइव्हच्या टप्पा पूर्ण करणे यांचा समावेश आहे. सद्यस्थितीला प्रकल्पातील मुख्य ड्राईव्हचे काम वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

Central Railway : मध्य रेल्वेने साजरा केला जागतिक वारसा दिन

मुंबई : मध्य रेल्वेने जागतिक वारसा दिन-२०२६ उत्साहात साजरा केला. हा कार्यक्रम युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ व मध्य

ATS : केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहतूक व्यावसायिकांना दिलासा

मुंबई : 'एटीएस' (ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन) प्रणालीतील तांत्रिक बदलांमुळे रखडलेली वाहन परवाना नूतनीकरण प्रक्रिया

Uninterrupted Power Supply : अखंड वीजपुरवठ्यासाठी राज्यात होणार ‘एआय’चा वापर

मुंबई : वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची विक्रमी मागणी पूर्ण करतानाच, वीजनिर्मिती आणि पुरवठ्यात

Data Centers in Maharashtra : मध्य आशियातील नामांकित कंपन्या महाराष्ट्रात डेटा सेंटर स्थापन करणार

मुंबई : राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले असून, मध्य आशियातील डेटा सेंटर

Rain In Maharashtra : उष्माघातानंतर राज्यासमोर वादळी पावसाचे संकट

मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२

New Law : जमीनधारक होणार विकास प्रक्रियेत भागीदार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मुंबई महानगर