मुंबईतील घरांसाठी म्हाडा लॉटरी

मुंबई : मुंबईमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडाच्या मुंबईत मंडळामार्फत या आठवड्यात सुमारे २५०० घरांसाठी सोडतीची जाहिरात काढण्याची शक्यता आहे. या सोडतीत मुंबईतील विविध भागांतील घरे उपलब्ध होणार असून, अनेकजण या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लॉटरीमध्ये विक्रोळी, पहाडी गोरेगाव, पवई, जुहू, ताडदेव, बोरिवली आणि पंतनगर या भागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे सुमारे १२०० घरे उपलब्ध होणार आहेत, यामुळे या भागाकडे अधिक लक्ष लागले आहे.


यंदाच्या लॉटरीतील घरे थोडी महागडी ठरण्याची शक्यता आहे. घरांच्या किंमती अंदाजे ३२ लाख रुपयांपासून सुरू होऊन तब्बल ८ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहेत. पहाडी गोरेगावमधील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काही घरे सुमारे ३२ लाख रुपयांत मिळणार आहेत, मात्र इतर बहुतांश घरे कोटींच्या घरात असल्याने सर्वसामान्यांसाठी ती परवडणारी नसल्याची चर्चा आहे. ३१ मार्च रोजी लॉटरीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्जदारांनी वेळेत अर्ज सादर करणे आवश्यक आहे, कारण संगणकीय पद्धतीने पारदर्शक सोडत काढली जाते.


अर्ज करण्यासाठी काही अटीही ठरवण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. विवाहित असल्यास पती-पत्नीचे आधार आणि पॅन कार्ड आवश्यक आहे, तर अविवाहित व्यक्तींनी स्वतःची कागदपत्रे सादर करावी लागतील. याशिवाय अर्जदाराने महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य केल्याचा अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) असणे बंधनकारक आहे. या लॉटरीत मुख्यतः मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी जास्त घरे असणार आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजीही व्यक्त होत आहे. तरीही, मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर मिळवण्याची ही एक मोठी संधी मानली जात आहे. यापूर्वी २०२४ मध्ये म्हाडाने सुमारे २००० घरांसाठी लॉटरी काढली होती, ज्यात घरांच्या किंमती २९ लाख ते ६.८२ कोटी रुपयांदरम्यान होत्या. २०२५ मध्ये लॉटरी न झाल्याने यंदाच्या सोडतीकडे विशेष लक्ष लागले आहे. मुंबईत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही लॉटरी महत्त्वाची ठरणार असून, इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध