डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्र ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खंबाळपाडा भागातील एक जलकुंभाच्या जलवाहिनीमध्ये गळती होत असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जात आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका उल्हासनदीतून पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते. मोहिली उदंचन केंद्रातून उचललेले पाणी नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात पाठविले जाते आणि तेथे शुध्दीकरणानंतर डोंबिवली पूर्व व पश्चिम शहरांना पुरवठा केले जाते.


केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयाने अमृत योजना दोन चा टप्पा महापालिका हद्दीत राबविला जात आहे. या योजनेतून खंबाळपाडा भागातील एका उंच जलकुंभाची अंतर्गत जलवाहिका महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात आली आहे. या जोडणीच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे गळती अधिक प्रमाणात झाली आहे. या गळतीचे पाणी परिसरात पसरल्याने दुरुस्ती आवश्यक ठरली आहे. मंगळवारी या ठिकाणी नवीन जोडसांधा बसविण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे गळती थांबेल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी म्हणाले. या कालावधीत नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच