डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहराचा पाणी पुरवठा येत्या मंगळवार, ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्र ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खंबाळपाडा भागातील एक जलकुंभाच्या जलवाहिनीमध्ये गळती होत असल्याने ती दुरुस्त करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जात आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका उल्हासनदीतून पाणी उचलते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील ग्राहकांपर्यंत पोहचवले जाते. मोहिली उदंचन केंद्रातून उचललेले पाणी नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रात पाठविले जाते आणि तेथे शुध्दीकरणानंतर डोंबिवली पूर्व व पश्चिम शहरांना पुरवठा केले जाते.


केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयाने अमृत योजना दोन चा टप्पा महापालिका हद्दीत राबविला जात आहे. या योजनेतून खंबाळपाडा भागातील एका उंच जलकुंभाची अंतर्गत जलवाहिका महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडण्यात आली आहे. या जोडणीच्या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे गळती अधिक प्रमाणात झाली आहे. या गळतीचे पाणी परिसरात पसरल्याने दुरुस्ती आवश्यक ठरली आहे. मंगळवारी या ठिकाणी नवीन जोडसांधा बसविण्यासाठी काम करण्यात येणार आहे. यामुळे गळती थांबेल, असे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी म्हणाले. या कालावधीत नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र देखील बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य