पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र


नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्राप्त ४५ हजार ५८८ संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत १३ हजार ३३६ दुबार मतदार आढळून आले आहेत. या दुबार मतदारांकडून त्यांनी कोणत्या एका प्रभागातील मतदार यादीतून मतदान करणार आहेत, याबाबत विकल्प स्वरूपातील हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय बीएलओ पथके स्थापन करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रणालीद्वारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा मतदारसंघनिहाय यादीचे वर्गीकरण करण्यात आले. छायाचित्रांसह असलेली संभाव्य दुबार मतदारांची यादी बीएलओंकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी देण्यात आली होती. बीएलओंकडून फोटो पडताळणी, प्रभाग तपासणी, आई-वडिलांची नावे, पत्ता समान आहे की नाही यासह विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर आढळून आल्यास संबंधित मतदाराकडून कोणत्या पत्त्यावरील मतदार यादीतून मतदान करणार, याबाबत हमीपत्र घेण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : डोंबिवली आणि ठाकुर्ली या दोन स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य