पडताळणीअंती नवी मुंबईत १३ हजार ३३६ दुबार मतदार

एका ठिकाणी मतदान करण्याबाबत भरून घेतले हमीपत्र


नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्राप्त ४५ हजार ५८८ संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओ (बूथ लेव्हल अधिकारी) यांच्यामार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत १३ हजार ३३६ दुबार मतदार आढळून आले आहेत. या दुबार मतदारांकडून त्यांनी कोणत्या एका प्रभागातील मतदार यादीतून मतदान करणार आहेत, याबाबत विकल्प स्वरूपातील हमीपत्र भरून घेण्यात आले आहे.


राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय बीएलओ पथके स्थापन करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक प्रणालीद्वारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा मतदारसंघनिहाय यादीचे वर्गीकरण करण्यात आले. छायाचित्रांसह असलेली संभाव्य दुबार मतदारांची यादी बीएलओंकडे प्रत्यक्ष पडताळणीसाठी देण्यात आली होती. बीएलओंकडून फोटो पडताळणी, प्रभाग तपासणी, आई-वडिलांची नावे, पत्ता समान आहे की नाही यासह विविध निकषांवर तपासणी करण्यात आली. एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर आढळून आल्यास संबंधित मतदाराकडून कोणत्या पत्त्यावरील मतदार यादीतून मतदान करणार, याबाबत हमीपत्र घेण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Comments
Add Comment

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा