ठाण्यात काँग्रेसला खिंडार

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश


ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशीष गिरी यांनी मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि युवक अध्यक्ष विरू वाघमारे उपस्थित होते.


ठाण्यातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा ओघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष गिरी यांच्यासोबत राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेन गिरी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव तेजस गोपल, जयेश पाटील, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश क्षिरसागर, गोविंदा परदेशी, भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिषेक मिश्रा आणि अनेक ब्लॉक अध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीस उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ॲड. आशीष गिरी यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांवर टीका करत म्हटले की, “काँग्रेसवर नाराजी नसली तरी सध्याच्या जिल्हाध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.” प्रवेश केलेल्या सर्वांचे मुल्ला यांनी स्वागत करत, ठाणे शहरात युवकांशी एकत्र येऊन राष्ट्रवादीला जास्तीत जास्त यश मिळवून देण्याची शपथ घेतली.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ काळाच्या पडद्याआड

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकाळ ठसा उमटवणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि निर्णायक नेतृत्वासाठी

“बाळासाहेबांचा स्वाभिमान विकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी छातीचा कोट केला!”

“लाडक्या बहिणींच्या ताकदीवर 232 आमदार निवडून आणण्याचा इतिहास रचला; त्यामुळे विरोधकांची पोटदुखी

सलग दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दांडी

मुंबई : मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांतील महापौर पदावरून महायुतीत तणाव असल्याच्या चर्चा झडत असताना,

Chitra Wagh : 'आमच्याकडे संविधनाचं शस्त्र आहे ...' अंजली भारतीच्या वक्तव्यावर चित्रा वाघ संतापल्या

गायिका अंजली भारती यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता

बाळासाहेब ठाकरेंनी टीका केलेल्या सोनिया गांधी राऊतांना वंदनीय झाल्या का ?

भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा परखड सवाल  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याचा महाबळेश्वर मधून सुरवात

जिल्हा परिषद पंचायत समिती प्रचाराचे फुंकले रणशिंग २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे