संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली


मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून अफवा पसरवून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. राऊत यांच्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी होत असल्याचा दावा करत त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र टीका त्यांनी केली.


भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, संजय राऊत गॅस टंचाईबाबत सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांत ग्राहकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी मर्यादित तुटवडा जाणवत असला तरी तो वितरकांकडून साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.


केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोंदवलेल्या प्रत्येक मागणीप्रमाणे नागरिकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थितीवर नियमित आढावा घेतला जात असल्याचेही बन यांनी सांगितले. इराणसह विविध देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सध्या सुमारे ४० देशांकडून कच्चे तेल आयात करत असून देशात पेट्रोल आणि डिझेलसाठी कुठेही मोठ्या रांगा लागलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.


गॅस टंचाईबाबत काँग्रेस, राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्याकडून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी होत असल्याचे सांगत अशा साठेबाजांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली :


मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं, मिठी नदीच्या गाळातून कोणी घर बांधले हे मुंबईकरांना माहित आहे. या घोटाळ्यातला दिनो मोरिया कोणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत हे मिठी नदीचा वारंवार उल्लेख करून आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, याच साठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदी चा गाळ याबद्दल चर्चा होण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि

Health Minister Prakash Abitkar : खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक

अतिरिक्त शुल्क घेतल्यास होणार कारवाई मुंबई : राज्यातील खासगी रुग्णालयांनी उपचारांचे दरफलक लावणे बंधनकारक असून

Strait of Hormuz : ३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली ; तेल, वायू अन् खतांचा जहाजात समावेश, २० हून अधिक जहाजे रांगेत

३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली

Environment Minister Pankaja Munde : प्रदूषण नियंत्रणासाठी शॉर्ट, मिड व लॉंग टर्म आराखडा;

मुंबई : चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लाँग टर्म गोल्सचा स्वतंत्र