संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली


मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून अफवा पसरवून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. राऊत यांच्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी होत असल्याचा दावा करत त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र टीका त्यांनी केली.


भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, संजय राऊत गॅस टंचाईबाबत सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांत ग्राहकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी मर्यादित तुटवडा जाणवत असला तरी तो वितरकांकडून साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.


केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोंदवलेल्या प्रत्येक मागणीप्रमाणे नागरिकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थितीवर नियमित आढावा घेतला जात असल्याचेही बन यांनी सांगितले. इराणसह विविध देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सध्या सुमारे ४० देशांकडून कच्चे तेल आयात करत असून देशात पेट्रोल आणि डिझेलसाठी कुठेही मोठ्या रांगा लागलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.


गॅस टंचाईबाबत काँग्रेस, राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्याकडून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी होत असल्याचे सांगत अशा साठेबाजांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली :


मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं, मिठी नदीच्या गाळातून कोणी घर बांधले हे मुंबईकरांना माहित आहे. या घोटाळ्यातला दिनो मोरिया कोणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत हे मिठी नदीचा वारंवार उल्लेख करून आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, याच साठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदी चा गाळ याबद्दल चर्चा होण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

Iran - America War : इराणकडे जाणारे तेलवाहू जहाज अमेरिकेने अडवले; नौदल नाकेबंदीनंतरची पहिली मोठी कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेने गुरुवारी पहाटे (स्थानिक वेळेनुसार बुधवारी) इराणमधील एका बंदराकडे जाण्याचा प्रयत्न

MPSC Exam : एमपीएससीची परीक्षा तूर्त ऑफलाईन

- ऑनलाइन परीक्षा पद्धती ऑगस्ट २०२७ पासून; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

FIFA World Cup 2026 Lionel Messi : अर्जेंटिनाच्या चाहत्यांसाठी डबल धमाका! एमबाप्पेला मागे टाकत मेस्सीचा नवा विक्रम तर अर्जेंटिना सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

फिफा विश्वचषक २०२६ मध्ये लिओनेल मेस्सी (FIFA World Cup 2026 Lionel Messi) पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Latur Doctor Death : लातूरमध्ये प्रसिद्ध डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

लातूर : लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील नामांकित एम.जे. हॉस्पिटल (M.J. Hospital) येथील प्रसिद्ध