संजय राऊत देशात अराजकता निर्माण करत आहेत; भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

- आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली


मुंबई : उबाठा खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून अफवा पसरवून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. राऊत यांच्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी होत असल्याचा दावा करत त्यांच्या वक्तव्यांवर तीव्र टीका त्यांनी केली.


भाजपा प्रदेश कार्यालयात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, संजय राऊत गॅस टंचाईबाबत सातत्याने चुकीची माहिती पसरवत आहेत. शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांत ग्राहकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी मर्यादित तुटवडा जाणवत असला तरी तो वितरकांकडून साठेबाजीमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.


केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलेंडरची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोंदवलेल्या प्रत्येक मागणीप्रमाणे नागरिकांच्या घरापर्यंत सिलेंडर पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील परिस्थितीवर नियमित आढावा घेतला जात असल्याचेही बन यांनी सांगितले. इराणसह विविध देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत सध्या सुमारे ४० देशांकडून कच्चे तेल आयात करत असून देशात पेट्रोल आणि डिझेलसाठी कुठेही मोठ्या रांगा लागलेल्या नाहीत, असे त्यांनी सांगितले.


गॅस टंचाईबाबत काँग्रेस, राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्याकडून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही ठिकाणी जाणीवपूर्वक सिलेंडरची साठेबाजी होत असल्याचे सांगत अशा साठेबाजांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.



आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली :


मिठी नदीचा गाळ खाऊन कोण श्रीमंत झालं, मिठी नदीच्या गाळातून कोणी घर बांधले हे मुंबईकरांना माहित आहे. या घोटाळ्यातला दिनो मोरिया कोणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठी नदीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटलं याची इत्यंभूत माहिती सगळ्यांना आहे. संजय राऊत हे मिठी नदीचा वारंवार उल्लेख करून आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांना संपवायचं आणि संपूर्ण उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, याच साठी संजय राऊत मिठी नदी, मिठी नदी चा गाळ याबद्दल चर्चा होण्याचा प्रयत्न करत आहेत.

Comments
Add Comment

Nashik News : पर्यावरणदिनी नंदिनी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम, मंत्री गिरीश महाजनही झाले सहभागी

Nashik News : जागतिक पर्यावरण दिनाच्या (World Environment Day) पार्श्वभूमीवर व 'उन्नत नाशिक अभियान' अंतर्गत आज नाशिक शहरातील नंदिनी

Maratha students : मराठा विद्यार्थ्यांना आता 'ओबीसी'प्रमाणेच शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'महाडीबीटी' पोर्टलवर होणार तांत्रिक बदल, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच

Buldhana Crime : शिर नसलेलं धड बघून सगळेच हादरले; शिवानी कळमेकर प्रकरणात नवे वळण

बुलढाणा : मागील महिन्यात शिवानी कळमेकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होत. भावाने आणि

Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे