"काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नाही"; पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

- सततच्या पराभवातून आलेल्या नैराश्यातूनच काँग्रेसचा देशाविरोधात मोर्चा


आसाम सोबतच देशातील बहुतेक राज्यांमध्ये जनतेने काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे सतत हरणारी काँग्रेस लवकरच पराभवाचे शतक पूर्ण करेल. पराभवाच्या याच नैराश्यातून काँग्रेसने देशविरोधात मोर्चा उघडल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आसाममध्ये आज, शनिवारी (१४ मार्च) पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग–सिलचर कॉरिडोरचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.


याप्रसंगी गेल्या महिन्यात भारत मंडपम येथे झालेल्या एआय समिटदरम्यान काँग्रेस सदस्यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, एआय समिटला बदनाम करण्याच्या प्रयत्नात काँग्रेसने विचित्र प्रकारचे आंदोलन केले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे कपडे फाडून निषेध नोंदवला.या आंदोलनावर टीका करताना मोदी म्हणाले की, आता काँग्रेसकडे निराशेत स्वतःचे कपडे फाडण्याव्यतिरिक्त काहीही शिल्लक नसल्याचे दिसून येते.





आसामच्या युवकांविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, काँग्रेसने असमला ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाची प्रयोगशाळा बनवली होती. मात्र आज असमच्या युवकांसमोर संधींचे विस्तीर्ण आकाश खुले झाले आहे. तसेच काँग्रेसने ईशान्य भारताला अनेक वर्षे दुर्लक्षित केले. स्वातंत्र्यानंतर सीमारेषा अशा पद्धतीने निश्चित करण्यात आल्या की बराक खोऱ्याचा समुद्राशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटल्याचे मोदींनी नमूद केले. बराक खोरे एकेकाळी महत्त्वाचे व्यापारमार्ग आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जात होते, पण त्याची ताकद हिरावून घेतली गेली. स्वातंत्र्यानंतरही अनेक दशकं काँग्रेस सत्तेत होती, तरीही बराक खोऱ्याच्या विकासासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याची टीका त्यांनी केली.


पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले की, असममधील भाजपच्या नेतृत्वाखालील डबल-इंजिन सरकार बराक खोऱ्याला बदलण्यासाठी आणि त्याला पुन्हा व्यापार व उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. जिथे काँग्रेसची विचारसरणी संपते, तिथून आमचे काम सुरू होते. हा ईशान्य भारतातील पहिला एक्सेस-कंट्रोल्ड हाय-स्पीड कॉरिडोर असेल. हा केवळ महामार्ग प्रकल्प नाही, तर ईशान्य भारतातील लोकांच्या दशकांपासूनच्या प्रतीक्षेचा अंत असल्याचे मोदींनी सांगितले.

Comments
Add Comment

ऑनलाईन गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स गल्लत नको! महाराष्ट्र शासन लवकरच आणणार स्वतंत्र धोरण

मुंबई : महाराष्ट्र शासन राज्यातील वाढत्या ई-स्पोर्ट्स (E-Sports) क्षेत्रासाठी एक स्वतंत्र आणि सर्वसमावेशक धोरण आणणार

Loan waiver scheme : आणखी १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार

- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार निर्णय मुंबई : "पुण्यश्लोक

Agriculture Minister Dattatray Bharne : पेरणीची घाई करू नका!

 कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन; खरीप पूर्वतयारीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत सुविधा केंद्र

Vidya Balan : ओंकार भोजनेच्या डायलॉगवर विद्या बालनची रील; ‘हास्यजत्रा कलाकारांनीही' केल्या भन्नाट कमेंट्स

Vidya Balan : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम केवळ महाराष्ट्रातील प्रेक्षकांचाच नाही, तर बॉलीवूड कलाकारांचाही

FIFA World Cup 2026 : सहा मिनिटांच्या हायड्रेशन ब्रेकसवरून पुन्हा वाद ! खेळाडूंच्या आरोग्याची काळजी की कोट्यवधी रुपयांचा जाहिरात व्यवसाय ??

मेक्सिको : फिफा वर्ल्ड कप २०२६ हा वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा वर्ल्ड कप असून अनेक कारणांमुळे चर्चेत

Wedding Invitations : बालविवाहाच्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी सरकारची मोठी पावले: लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे होणार अनिवार्य

मुंबई : राज्यातील बालविवाहाची (Child Marriage) प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठी आणि अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणाऱ्या