मीरा-भाईंदर महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल

पदाधिकारी निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच विश्वा


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे मीरा रोड येथील शिवार गार्डन मैदानात पदाधिकारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना “आम्हाला खुर्चीचा लोभ नाही, शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे अंतिम ध्येय आहे,” असे स्पष्ट केले. ''येत्या निवडणुकीत महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल'', असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


शिंदे म्हणाले की, मागील १०–१२ वर्षांत मीरा-भाईंदरमध्ये अभूतपूर्व बदल झाले असून विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी एकजूट आवश्यक आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शहराच्या विकासासाठी प्रभावी काम केले असून, विकासाबरोबरच शिवसेनेची संघटनात्मक ताकदही वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले.


“शिवसेना हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो निष्ठेने काम करतो तोच राजकारणात पुढे जातो,” असे सांगत प्रताप सरनाईक हे त्याचे जिवंत उदाहरण असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शिवसैनिकांनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहून महापालिकेवर भगवा फडकवावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. मीरा-भाईंदरमध्ये महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल, असा संकेत देत याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्येक कार्यकर्त्याने आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. या निर्धार मेळाव्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, निशा नार्वेकर, रिया म्हात्रे, पूजा आमगावकर, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


Comments
Add Comment

मुंबई–नाशिक महामार्गावरील कोंडी लवकरच इतिहास जमा होणार? मार्च २०२६ पर्यंत .....

ठाणे : मुंबई–नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजिवडा ते वडपे या

रस्ते-मेट्रो-पाणी प्रकल्पांना गती देणार, हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

१७०० कोटी प्रस्तावीत करण्याच्या पालकमंत्री शिंदे यांनी दिल्या सूचना पावसाळ्यापूर्वी ठाणे जिल्हा अलर्ट

10th-12 Board Exam 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

ठाणे: आजपासून म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर २० फेब्रुवारी

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया