वनजमीन शेतीसाठी भाड्याने देणे बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


नागपूर : वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता वनजमीन शेतीसाठी भाड्याने देता येणार नाही, तसेच अशा प्रकारे दिलेला कोणताही भाडेपट्टा बेकायदेशीर असून तो सुरू ठेवता येणार नाही, असा ठाम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, वनजमीन शेतीसाठी वापरण्यास परवानगी देणे म्हणजे प्रत्यक्षात जंगलतोडीस प्रोत्साहन देणे होय. वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ नुसार केंद्र सरकारची पूर्वपरवानगी नसताना वनजमीनचे ‘डि-रिझर्वेशन’ किंवा गैर-वन उद्देशांसाठी वापर निषिद्ध आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच बेकायदेशीररीत्या दिलेला भाडेपट्टा पुढे सुरू ठेवण्याची कोणतीही परवानगी देता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निरीक्षणांच्या आधारे, कर्नाटक उच्च न्यायालयाचा तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, ज्यात एका सहकारी संस्थेला वनजमिनीवरील भाडेपट्टा सुरू ठेवण्यासाठी निवेदन सादर करण्याची मुभा देण्यात आली होती.


न्यायालयाने ठरवले की, १३४ एकरांहून अधिक क्षेत्रफळाच्या वनजमिनीवर शेतीसाठी भाडेपट्टा देणे हेच मुळात बेकायदेशीर होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड व पर्यावरणाची हानी झाली. दहा वर्षांहून अधिक काळ या वनक्षेत्रावर शेती करून लाभ घेतलेल्या सहकारी संस्थेला पुढील मुदतवाढ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सध्याच्या कायद्यांनुसार शेतीसह कोणताही गैर-वन उपयोग वनजमिनीवर करता येत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट