वनजमीन शेतीसाठी भाड्याने देणे बेकायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय


नागपूर : वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत केंद्र सरकारची पूर्वपरवानगी न घेता वनजमीन शेतीसाठी भाड्याने देता येणार नाही, तसेच अशा प्रकारे दिलेला कोणताही भाडेपट्टा बेकायदेशीर असून तो सुरू ठेवता येणार नाही, असा ठाम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, वनजमीन शेतीसाठी वापरण्यास परवानगी देणे म्हणजे प्रत्यक्षात जंगलतोडीस प्रोत्साहन देणे होय. वनसंरक्षण अधिनियम, १९८० च्या कलम २ नुसार केंद्र सरकारची पूर्वपरवानगी नसताना वनजमीनचे ‘डि-रिझर्वेशन’ किंवा गैर-वन उद्देशांसाठी वापर निषिद्ध आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच बेकायदेशीररीत्या दिलेला भाडेपट्टा पुढे सुरू ठेवण्याची कोणतीही परवानगी देता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. या निरीक्षणांच्या आधारे, कर्नाटक उच्च न्यायालयाचा तो आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, ज्यात एका सहकारी संस्थेला वनजमिनीवरील भाडेपट्टा सुरू ठेवण्यासाठी निवेदन सादर करण्याची मुभा देण्यात आली होती.


न्यायालयाने ठरवले की, १३४ एकरांहून अधिक क्षेत्रफळाच्या वनजमिनीवर शेतीसाठी भाडेपट्टा देणे हेच मुळात बेकायदेशीर होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड व पर्यावरणाची हानी झाली. दहा वर्षांहून अधिक काळ या वनक्षेत्रावर शेती करून लाभ घेतलेल्या सहकारी संस्थेला पुढील मुदतवाढ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सध्याच्या कायद्यांनुसार शेतीसह कोणताही गैर-वन उपयोग वनजमिनीवर करता येत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Comments
Add Comment

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

शिल्पांच्या माध्यमातून राम सुतारांची कला शतकानुशतके स्मरणात राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांचे बुधवारी (१७ डिसेंबर) रात्री निधन झाले. त्यांच्या

शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड - उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय स्मारक शिल्पांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणारा प्रतिभावान शिल्पकार गमावला - उपमुख्यमंत्री अजित