रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा


मुंबई : राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२६ मधील 'ई-पीक पाहणी' करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.


बावनकुळे म्हणाले की, "२५ जानेवारी २०२६ पासून सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणीची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत रब्बी हंगामातील पिकांची केवळ ५५.६९ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. सुमारे ४५ टक्के शेतकरी या नोंदणी प्रक्रियेपासून लांब आहेत. ही नोंदणी १०० टक्के पूर्ण व्हावी, या हेतूने सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.पीक विम्यासह सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ई-पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे.”


जमाबंदी आयुक्त आणि कृषी आयुक्त यांनी समन्वयाने काम करून 'ॲग्री स्टॅक' मधील डेटाची नोंदणी तातडीने पूर्ण करावी," अशी सूचना प्रशासनाला केली असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले की, पीक पाहणीची पडताळणी अचूक आणि वेळेत व्हावी, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण