मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम

पुणे : तत्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ओटीपीद्वारे पडताळणीची नवी प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या निर्णयानुसार १९ डिसेंबरपासून पुण्याशी संबंधित मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ही व्यवस्था अंमलात येणार आहे.


नव्या पद्धतीनुसार पुणे–अमरावती एक्सप्रेस, पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस, सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस या गाड्यांवर तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी पडताळणी बंधनकारक राहणार आहे.


या बदलानंतर आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांना ओटीपी देणे आवश्यक असेल. बुकिंगवेळी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल आणि तो टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.


ओटीपी पडताळणीदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवाशांनी तिकीट बुकिंग करताना स्वतःचा चालू आणि अचूक मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या नव्या व्यवस्थेमुळे तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये पारदर्शकता वाढेल आणि गैरवापराला आळा बसण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४