धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याने त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयासमोर काल (१५ डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश सावंत असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.


प्रकाश सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर स्वत: च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले त्यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या लोकांनी धाव घेत त्यांना वाचवलं.
पण, तोपर्यंत प्रकाश सावंत हे ५०-६० टक्के भाजल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समोर आले आहे. वकिलांसोबत झालेल्या पैशाच्या वादातून त्यांनी स्वतःला जाळून घेतले असल्याचे त्यांनी आत्मदहनाच्या आधी एका नोटमध्ये लिहिले होते.





प्रकाश सावंत यांनी आत्महत्या नोटमध्ये काय लिहले?


प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांनी त्यांच्या नोटमध्ये लिहिले की, कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार आणि वकील स्नेहा हरणे यांनी ५ ते ६ वेळा हक्कसोड लिहून घेतले, त्याबद्दल कित्येक तक्रारी केल्या. तरी लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर वकिल स्नेहा हरणे यांना सन २०२१ रोजी ६ लाख ८० हजार इतकी रक्कम या केससाठी दिलेली आहे, मात्र त्या सदरची रक्कम परत करत नाहीत. या विरोधात प्रकाश सावंत यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा इथे वकील स्नेहा हरणे यांच्या विरुद्ध तक्रार केली होती.


त्यावेळी जोशी नावाचे वकिल न्यायाधीश होते. त्यांनी सुद्धा वकिल स्नेहा हरणे यांना वॉर्निंग दिली होती आणि सांगितलं होतं की, प्रकाश सावंत यांचे सगळे पैसे व्याजासह द्यावे. तरी स्नेहा हरणे वकील यांनी फक्त ६ लाख इतकी रक्कम परत केली. मात्र ८० हजार ही व्याज रक्कम अजून दिलेली नाही. याबाबतची तक्रार बार कॉऊन्सील येथील रणपिसे सर यांच्याकडे १० ऑक्टोबर, २०२३ रोजीपासून आतापर्यंत ५ ते ६ वेळा केली आहे. मात्र ते सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यानंतर याबाबतची तक्रार दिल्ली मंत्रालय इथे सुद्धा ५ वेळा केल्यावर, दिल्ली मंत्रालयाने कणकवली पोलिसांना या विषयी सुचित केले. मात्र कणकवली पोलीसही याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाहीत.


राज्य सरकार आणि दिल्ली मंत्रालय येथे मी अनेक वेळा तक्रार दिली. नरडवे महमदवाडी प्रकल्पामुळे आमची जागा कणकवली सरकार यांनी घेतली आहे. जर या जागा मोबदला आम्हाला न मिळाल्यास कोणतीही अघटित घटना घडल्यास त्यास आमची कोणतीही जबाबदार नसेल.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,

१२ फेब्रुवारी रोजी भारत बंद; शाळा, महाविद्यालय, कार्यालय... जाणून घ्या या दिवशी काय सुरु अन् काय बंद ?

मुंबई : विविध कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त

शिवसेनेच्या खासदारांनी घेतली भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची भेट

नवी दिल्ली :  भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांची आज दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय

Devendra Fadanvis : 'अस्सल मराठी चेहरा आणि दांडगा अनुभव'; रितू तावडेंच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; बाळासाहेबांना ज्या प्रकारचं...

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदी अखेर भाजपच्या रितू

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डची अनिवार्यता --- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली