नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त करण्यासाठी रबाळे, पावणे आणि तुर्भे येथे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. त्याशिवाय पाम बीच रोडच्या जंक्शनजवळ, विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापाशी, एक दुहेरी भुयारी मार्ग अंडरपास तयार करण्यात येणार आहे.


सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोली-वाशी येथील खाडी पुलांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सत्ताधारी पक्षाने व्यक्त केले.


हा प्रकल्प 'हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल' अंतर्गत राबवला जाणार आहे. यानुसार, प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ३० टक्के रक्कम सुरुवातीला दिली जाईल. तर उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांत हप्त्यांद्वारे भरली जाईल. यामुळे महानगरपालिकेवर अचानक कोणताही मोठा आर्थिक बोजा पडणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


सभागृहात हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला असला, तरी विरोधकांनी यावर आक्षेप घेतले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च, कंत्राटदाराची माहिती आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती यांबाबत स्पष्टता नसल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. खर्चात पारदर्शकता असावी आणि निधीचा अपव्यय होऊ नये, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर