नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त करण्यासाठी रबाळे, पावणे आणि तुर्भे येथे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. त्याशिवाय पाम बीच रोडच्या जंक्शनजवळ, विशेषतः नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापाशी, एक दुहेरी भुयारी मार्ग अंडरपास तयार करण्यात येणार आहे.


सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि ऐरोली-वाशी येथील खाडी पुलांमुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सत्ताधारी पक्षाने व्यक्त केले.


हा प्रकल्प 'हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल' अंतर्गत राबवला जाणार आहे. यानुसार, प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या ३० टक्के रक्कम सुरुवातीला दिली जाईल. तर उर्वरित ७० टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांत हप्त्यांद्वारे भरली जाईल. यामुळे महानगरपालिकेवर अचानक कोणताही मोठा आर्थिक बोजा पडणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


सभागृहात हा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला असला, तरी विरोधकांनी यावर आक्षेप घेतले आहेत. प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च, कंत्राटदाराची माहिती आणि तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती यांबाबत स्पष्टता नसल्याचा दावा शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला. खर्चात पारदर्शकता असावी आणि निधीचा अपव्यय होऊ नये, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे आणि नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,