विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार


मुंबई : शाळेतील मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत कठोर नियमावली लागू केली असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे.


शाळेत शिकणाऱ्या मुलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे नियम केंद्र सरकारच्या २०२१ च्या 'शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां'वर आधारित आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळेत मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण (उदा. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे) किंवा वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही.



दोन दिवसांच्या आत अहवाल पाठवणे बंधनकारक


- कोणतीही अनुचित घटना घडली तर मुख्याध्यापकांना ताबडतोब ती नोंद करावी लागेल आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. याशिवाय घटनेशी संबंधित सर्व पुरावे, जसे की मुलांची हजेरी, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी नीट जपून ठेवावे लागतील.

- जर घटना गंभीर असेल, विशेषतः लैंगिक छळाशी संबंधित, तर पोक्सो कायद्याने आणि बाल न्याय कायद्याने २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.





शिस्तभंगाची कारवाई होणार


हे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली, तर त्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल. एखादे वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ढिलाई खपवली जाणार नाही. सर्व शाळांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी नीट होईल यासाठी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर

Nasarapur : नसरापूर घटनेतील आरोपीकडून संतापजनक कबुली, चिमुकलीचा जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…

Nasarapur Rape Case : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'हिंदी' परीक्षेला स्थगिती

मुंबई : राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा देण्याबाबतचा निर्णय शासनाने

Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत