विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार


मुंबई : शाळेतील मुलांना अपमानास्पद बोलणे, मारहाण किंवा मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांवर आता कठोर केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबत कठोर नियमावली लागू केली असून, शाळेतील प्रत्येक शिक्षक, मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्पष्ट केली आहे.


शाळेत शिकणाऱ्या मुलांना शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. हे नियम केंद्र सरकारच्या २०२१ च्या 'शाळा सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक सूचनां'वर आधारित आहेत. त्यात शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. शाळेत मुलांना कोणत्याही प्रकारची मारहाण (उदा. हाताने मारणे, काठीने फटके मारणे, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे) किंवा वाईट बोलणे, अपमान करणे, मानसिक छळ किंवा भेदभाव करता येणार नाही.



दोन दिवसांच्या आत अहवाल पाठवणे बंधनकारक


- कोणतीही अनुचित घटना घडली तर मुख्याध्यापकांना ताबडतोब ती नोंद करावी लागेल आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल पाठवावा लागेल. याशिवाय घटनेशी संबंधित सर्व पुरावे, जसे की मुलांची हजेरी, अर्ज, वैद्यकीय रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी नीट जपून ठेवावे लागतील.

- जर घटना गंभीर असेल, विशेषतः लैंगिक छळाशी संबंधित, तर पोक्सो कायद्याने आणि बाल न्याय कायद्याने २४ तासांच्या आत पोलिसांत तक्रार करणे अनिवार्य आहे.





शिस्तभंगाची कारवाई होणार


हे नियम योग्य रीतीने पाळले जातील याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि मुख्याध्यापकांवरही मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. जर कोणी घटना लपवली, पुरावे नष्ट केले किंवा खोटी माहिती दिली, तर त्या व्यक्तीवर शिस्तभंगाची कठोर कारवाई होईल. एखादे वृत्तपत्र किंवा वाहिन्यांमध्ये अशा प्रकारची गंभीर बातमी आली, तर शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही ढिलाई खपवली जाणार नाही. सर्व शाळांना हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील आणि त्याची अंमलबजावणी नीट होईल यासाठी अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना