मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेऐवजी विकसित भारत – रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन (ग्रामीण) विधेयक २०२५ लोकसभेत मांडणार आहे. या नव्या योजनेला VB-G RAM G बिल असे नाव देण्यात आले आहे. मनरेगा २००५ पासून सुरू असून आता त्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत.


नवीन योजनेत खर्चाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारांवर असेल. सामान्य राज्यांसाठी खर्चाचा वाटा ६०:४०, तर ईशान्य व हिमालयीन राज्यांसाठी ९०:१० असा असेल. केंद्रशासित प्रदेशांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. यामुळे काम आणि निधीच्या वापरावर अधिक नियंत्रण राहील, असा सरकारचा दावा आहे.


या योजनेत शेतीच्या हंगामात सार्वजनिक कामे दिली जाणार नाहीत. वर्षातील सुमारे ६० दिवस काम बंद ठेवण्याची तरतूद असेल, जेणेकरून शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासू नये. मात्र रोजगार हमीचे दिवस १०० वरून १२५ करण्यात आले आहेत. वेळेवर काम न दिल्यास मजुरांना बेरोजगारी भत्ता देणे राज्यांना बंधनकारक असेल.


डिजिटल हजेरी, आधार आधारित पडताळणी आणि थेट बँक खात्यात पैसे देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पातळीवर ‘विकसित ग्राम पंचायत प्लान’ तयार केला जाणार असून कामांच्या आधारे पंचायतांना A, B आणि C श्रेणी दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही या योजनेअंतर्गत काम दिले जाईल. यासाठी यंदा १.५१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांच्या हत्येचा प्रयत्न

जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या