मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेऐवजी विकसित भारत – रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन (ग्रामीण) विधेयक २०२५ लोकसभेत मांडणार आहे. या नव्या योजनेला VB-G RAM G बिल असे नाव देण्यात आले आहे. मनरेगा २००५ पासून सुरू असून आता त्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत.


नवीन योजनेत खर्चाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारांवर असेल. सामान्य राज्यांसाठी खर्चाचा वाटा ६०:४०, तर ईशान्य व हिमालयीन राज्यांसाठी ९०:१० असा असेल. केंद्रशासित प्रदेशांचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. यामुळे काम आणि निधीच्या वापरावर अधिक नियंत्रण राहील, असा सरकारचा दावा आहे.


या योजनेत शेतीच्या हंगामात सार्वजनिक कामे दिली जाणार नाहीत. वर्षातील सुमारे ६० दिवस काम बंद ठेवण्याची तरतूद असेल, जेणेकरून शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासू नये. मात्र रोजगार हमीचे दिवस १०० वरून १२५ करण्यात आले आहेत. वेळेवर काम न दिल्यास मजुरांना बेरोजगारी भत्ता देणे राज्यांना बंधनकारक असेल.


डिजिटल हजेरी, आधार आधारित पडताळणी आणि थेट बँक खात्यात पैसे देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत पातळीवर ‘विकसित ग्राम पंचायत प्लान’ तयार केला जाणार असून कामांच्या आधारे पंचायतांना A, B आणि C श्रेणी दिली जाईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळातही या योजनेअंतर्गत काम दिले जाईल. यासाठी यंदा १.५१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक