मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा यंत्रणेने १४ दहशतवाद्यांना अटक केली. मणिपूरमधील सहा जिल्ह्यांमधील डोंगराळ भागात सुरक्षा यंत्रणेने एकाचवेळी कारवाई केली. अटक केलेल्या दहशतवादी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.


सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून २१ शस्त्रे, स्फोटक साहित्य, बंदी असलेल्या वस्तू आणि युद्धासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवायांना ताज्या जप्ती आणि अटकसत्रामुळे मोठे यश मिळाले आहे.


गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे ही कामगिरी करण्यात आली. अचूक नियोजन केल्यामुळे कमी कालावधीत सुरक्षा यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली. मणिपूरमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे सुरक्षादलांनी सांगितले आहे.


दरम्यान, मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईसोबतच राजकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. मे २०२३ नंतर प्रथमच कुकी आणि मैतेई समुदायातील भाजप आमदारांनी दिल्लीत बैठक घेतली. फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून या घडामोडींमुळे सरकार स्थापनेबाबत चर्चांना वेग आला आहे.

Comments
Add Comment

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)