मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा यंत्रणेने १४ दहशतवाद्यांना अटक केली. मणिपूरमधील सहा जिल्ह्यांमधील डोंगराळ भागात सुरक्षा यंत्रणेने एकाचवेळी कारवाई केली. अटक केलेल्या दहशतवादी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.


सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून २१ शस्त्रे, स्फोटक साहित्य, बंदी असलेल्या वस्तू आणि युद्धासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवायांना ताज्या जप्ती आणि अटकसत्रामुळे मोठे यश मिळाले आहे.


गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे ही कामगिरी करण्यात आली. अचूक नियोजन केल्यामुळे कमी कालावधीत सुरक्षा यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली. मणिपूरमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे सुरक्षादलांनी सांगितले आहे.


दरम्यान, मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईसोबतच राजकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. मे २०२३ नंतर प्रथमच कुकी आणि मैतेई समुदायातील भाजप आमदारांनी दिल्लीत बैठक घेतली. फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून या घडामोडींमुळे सरकार स्थापनेबाबत चर्चांना वेग आला आहे.

Comments
Add Comment

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या