पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी घटना पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरची आहे. राजगुरूनगरमध्ये खासगी कोचिंग क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. भर दिवसा हा थरकाप उडवणारा प्रकार घडला.


राजगुरूनगरमधील मांजरेवाडी परिसरात असलेल्या संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये दुपारच्या सुमारास हत्या झाली. दहावीचा वर्ग सुरू होता. शिक्षक शिकवत होते. क्लासचा दहावीचा वर्ग सुरू असताना बेंचवर बसलेल्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील विद्यार्थ्याने अचानक चाकूने हल्ला केला. आरोपी विद्यार्थ्याने गळ्यावर आणि पोटात अनेक वार केल्याने दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. पुरता रक्तबंबाळ झाला. याच अवस्थेत जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तोपर्यंत हल्लेखोर विद्यार्थी दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाला.


घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी सांगितले की, ही घटना खासगी कोचिंग क्लासमध्ये घडली असून आरोपी आणि मृत विद्यार्थ्यामध्ये पूर्वी काही वाद होता का, या दृष्टीने तपास केला जात आहे. दोघेही अल्पवयीन असल्याने तपास अधिक संवेदनशील पद्धतीने सुरू आहे.


सध्या शाळा आणि क्लास सुटण्याच्या वेळेत परिसरात पोलीस बंदोबस्त आणि पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय, याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे राजगुरूनगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून खासगी कोचिंग क्लासमधील सुरक्षा व्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि विद्यार्थ्यांवर असलेली देखरेख यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.



पालकांमध्ये भीतीचं वातावरण


या धक्कादायक घटनेनंतर पालकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. अनेक पालक शाळा आणि क्लास सुटण्याच्या वेळी स्वतः उपस्थित राहून आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाताना दिसत आहेत. शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षा व्यवस्था मजबूत करा, क्लासमध्ये कडक नियम लागू करा आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकरवी ठोस उपाययोजना करा; अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळा आणि क्लासच्या बाहेर विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या हाणामाऱ्या थांबवण्यासाठीही त्वरित कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Google's doodle : गुगलचं विशेष ‘पाय डे’ डूडल; गणितातील प्रसिद्ध स्थिरांकाला गुगलकडून अनोखा सलाम

मुंबई : गुगलने जगभरातील गणितप्रेमींसाठी १४ मार्च २०२६ रोजी खास डूडल सादर करून ‘पाय डे’ साजरा केला. या विशेष

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा