ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा


ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) २२३.७० कोटींची निविदा जाहीर केली आहे. याअंतर्गत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नागरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट या उन्नत मेट्रो स्थानकांचे बांधकाम होणार आहे.


ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो २९ किमीची मार्गिका असून त्यावर २२ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात ६ किमीच्या टप्प्यातील ६ स्थानकांचे काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण मार्गिकेतील २६ किमी मार्गिका उन्नत स्वरुपाची आहे. रेल्वे स्थानकाजवळील दोन मेट्रो स्थानके भूमिगत असतील. ठाण्यातील वागळे इस्टेट, घोडबंदर, कोलशेत, साकेत, इत्यादी महत्त्वाच्या अंतर्गत भागांना ही मेट्रो जोडेल. यामुळे ठाणेकरांचा अंतर्गत प्रवास सुलभ होणार आहे.


ठाणे मेट्रो मुंबईच्या मेट्रो ४ आणि मेट्रो ५ मार्गिकांना जोडल्यामुळे ठाणे ते मुंबई आणि ठाणे ते कल्याण मेट्रो प्रवास शक्य होईल. २०४५ पर्यंत या मेट्रोतून दैनंदिन ८ लाख ७० हजार प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त भागीदारीतून उभा राहणारा हा प्रकल्प १२ हजार २०० कोटींचा आहे. हा प्रकल्प ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी शाश्वत, स्वच्छ आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय ठरेल. यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, इंधन बचत होईल आणि हरितगृह वायू उत्सर्जनात घट होईल. विद्यार्थी, नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांसाठी ही मेट्रो जलद, स्वस्त आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय ठरेल.

Comments
Add Comment

सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणार परिणाम

ठाणे : गर्डर काढण्याच्या कामामुळे येत्या शनिवारी ३१ जानेवारी रोजी सफाळे आणि केळवे रोड दरम्यान ब्लॉक घेण्यात

श्री मलंगगड यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज

अप्पर आयुक्तांकडून सुरक्षेचा सखोल आढावा कल्याण : ठाणे जिल्ह्यातील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या श्री मलंगगड

धारण तलावाच्या स्वच्छतेकडे महापालिका सतर्क

तलावांच्या स्वच्छतेसाठी खारफुटी हटवण्याचा प्रस्ताव नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईमध्ये पुरस्थिती

ठाण्याच्या महापौर निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट

ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौर पदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून, ३० जानेवारी रोजी

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा