धरमशाला टी ट्वेंटी सामन्यात भारताचा विजय, मालिकेत घेतली आघाडी

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला येथे झालेला सामना भारताने सात विकेट राखून जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ११७ धावांत गुंडाळला. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने १५.५ षटकांत तीन बाद १२० धावा केल्या आणि सामना जिंकला.  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (शून्य धावा) आणि एडन मर्कराम (६१ धावा) या दोघांना बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर झाला.


प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत सर्वबाद ११७ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने एक, रीझा हेंड्रिक्सने शून्य, एडन मर्करामने ६१, डेवॉल्ड ब्रेव्हिसने दोन, ट्रिस्टन स्टब्सने नऊ, कॉर्बिन बॉशने चार, डोनोव्हन फरेराने २०, मार्को जॅनसेनने दोन, अँरिक नॉर्टजेने १२, लुंगी न्गिडीने नाबाद दोन, ओटनील बार्टमनने एक धावांचे योगदान दिले. भारताकडून वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा या चौघांनी प्रत्येकी दोन तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या भारताकडून अभिषेक शर्माने ३५, शुभमन गिलने २८, तिलक वर्माने नाबाद २५, सूर्यकुमार यादवने १२, शिवम दुबेने नाबाद १० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कॉर्बिन बॉश, लुंगी न्गिडी आणि मार्को जॅनसेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.


भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी आणि धरमशाला येथील टी ट्वेंटी सामना सात विकेट राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. या दोन सामन्यांत काय होते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.


चौथा टी ट्वेंटी सामना - लखनऊ - १७ डिसेंबर २०२५


पाचवा टी ट्वेंटी सामना - अहमदाबाद - १९ डिसेंबर २०२५



हार्दिक पांड्याची ऐतिहासिक कामगिरी


हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात खेळताना ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये १०० विकेट घेतल्या. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि १०० विकेट अशा दोन्ही कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू होण्याचा मान हार्दिक पांड्याने पटकावला. ट्रिस्टन स्टब्सची विकेट घेत हार्दिकने १०० विकेट टप्पा गाठला. याआधी अर्शदीप आणि जसप्रीत बुमराह यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये विकेटचे शतक साजरे केले आहे.



टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज


अर्शदीप सिंग १०८ विकेट


जसप्रीत बुमराह १०१ विकेट


हार्दिक पांड्या १०० विकेट

Comments
Add Comment

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Riyan Parag :‘मी काहीही केलं तरी…’ रियान परागचा संताप अनावर; समालोचकांनाही दिला थेट इशारा

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या

WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या

FIFA World Cup 2026: २०२६ फिफा वर्ल्ड कपसाठी पोर्तुगालचा संघ जाहीर; अखेरच्या स्वप्नासाठी रोनाल्डो सज्ज

Portugal : फिफा वर्ल्ड कप २०२६ साठी पोर्तुगाल राष्ट्रीय फुटबॉल संघटनाने अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व

MI VS KKR : मुंबई विरुद्ध केकेआर मध्ये हायव्होल्टेज लढत; प्लेऑफसाठी KKR ला विजय आवश्यक; हार्दिक पांड्याचे पुनरागमन ?

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज 65 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना Eden Gardens