सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू १२० वर्षांनी बाहेर काढणार

भुवनेश्वर  : ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) हाती घेतलेल्या या कामामुळे १२० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच गर्भगृहातून वाळू काढली जाणार आहे.


मंदिर कोसळण्याचा धोका असल्याने त्याला आधार देण्यासाठी ब्रिटिश अभियंत्यांनी १९०३ मध्ये तेथे वाळू भरली होती. या घटनेनंतर १२० वर्षांनंतर गर्भगृहातील वाळू काढण्याचा निर्णय ‘एआयएस’ने घेतल्याने इतकी वर्षे बंद असलेल्या त्या कक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गर्भगृहाच्या आतील वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले असल्याचे तेथे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गर्भगृहात दाबून बसलेल्या वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले आहे. प्राथमिक मोजमापांनुसार गर्भगृहाची भिंत सुमारे आठ मीटर जाड आहे. सूर्य मंदिराची एकूण उंची सुमारे १२७ फूट आहे. पश्चिमेकडे जमिनीपासून सुमारे ८० फूट उंचीवर प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे.


आतापर्यंत काढण्यात आलेल्या साहित्यामध्ये वाळू आणि दगडाचे तुकडे आहेत. हे सर्व नमुने आता वैज्ञानिक विश्लेषणासाठी गोळा करण्यात येत आहेत. ‘एएसआय’च्या प्रारंभिक अहवालांनुसार वाळूने भरलेल्या कक्षात आद्रता आहे. यामुळेच आतल्या भागाची झीज होण्याची किंवा त्याचा नाश होण्याची शक्यता होती.


गर्भगृहातील माती काढताना मंदिराची हानी होऊ नये, यासाठी दहा सदस्यांच्या तज्ज्ञ पथकाकडून डायमंड-ड्रिल तंत्रज्ञान आणि कंपनविरहित यंत्रणा यांचा वापर करून खोलवर ड्रिलिंग केले जात आहे. मंदिराच्या नाजूक खोंडालाइट दगडांच्या रचनेला कोणताही धक्का बसू नये यासाठी सुरक्षेचे उपाय केले जात आहेत.


ड्रिलिंगचे ठिकाण ‘जगमोहन’ (सभा मंडप)च्या पश्चिमेकडील भागात, पहिल्या आणि दुसऱ्या स्तरादरम्यान निश्चित केलेले आहे. तेथून पुढे वाळू बाहेर काढण्यासाठी नियोजित बोगद्याची उभारणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यांतून जाणार

मुंबई : एमएसआरडीसीने ८५६ किमीच्या महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील ३९५ गावांतून जाणार असलेल्या शक्तिपीठ

कर्तव्यपथावर 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर, प्रजासत्ताक दिनी दिसले देशाचे सामर्थ्य

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर संचलनाचे अर्थात

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

मोदी सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा

नवी दिल्ली : मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

फिलिपाईन्समध्ये बोट बुडून अनेकांचा मृत्यू

झांबोआंगा : फिलिपाईन्समध्ये झांबोआंगा येथून सुलू प्रांतातील जोलो बेटाच्या दिशेने निघालेली बोट समुद्रात

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे