सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू १२० वर्षांनी बाहेर काढणार

भुवनेश्वर  : ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराच्या गर्भगृहातील वाळू बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) हाती घेतलेल्या या कामामुळे १२० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच गर्भगृहातून वाळू काढली जाणार आहे.


मंदिर कोसळण्याचा धोका असल्याने त्याला आधार देण्यासाठी ब्रिटिश अभियंत्यांनी १९०३ मध्ये तेथे वाळू भरली होती. या घटनेनंतर १२० वर्षांनंतर गर्भगृहातील वाळू काढण्याचा निर्णय ‘एआयएस’ने घेतल्याने इतकी वर्षे बंद असलेल्या त्या कक्षात प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गर्भगृहाच्या आतील वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले असल्याचे तेथे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गर्भगृहात दाबून बसलेल्या वाळूच्या थरापर्यंत ड्रिलिंग सुरू झाले आहे. प्राथमिक मोजमापांनुसार गर्भगृहाची भिंत सुमारे आठ मीटर जाड आहे. सूर्य मंदिराची एकूण उंची सुमारे १२७ फूट आहे. पश्चिमेकडे जमिनीपासून सुमारे ८० फूट उंचीवर प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे.


आतापर्यंत काढण्यात आलेल्या साहित्यामध्ये वाळू आणि दगडाचे तुकडे आहेत. हे सर्व नमुने आता वैज्ञानिक विश्लेषणासाठी गोळा करण्यात येत आहेत. ‘एएसआय’च्या प्रारंभिक अहवालांनुसार वाळूने भरलेल्या कक्षात आद्रता आहे. यामुळेच आतल्या भागाची झीज होण्याची किंवा त्याचा नाश होण्याची शक्यता होती.


गर्भगृहातील माती काढताना मंदिराची हानी होऊ नये, यासाठी दहा सदस्यांच्या तज्ज्ञ पथकाकडून डायमंड-ड्रिल तंत्रज्ञान आणि कंपनविरहित यंत्रणा यांचा वापर करून खोलवर ड्रिलिंग केले जात आहे. मंदिराच्या नाजूक खोंडालाइट दगडांच्या रचनेला कोणताही धक्का बसू नये यासाठी सुरक्षेचे उपाय केले जात आहेत.


ड्रिलिंगचे ठिकाण ‘जगमोहन’ (सभा मंडप)च्या पश्चिमेकडील भागात, पहिल्या आणि दुसऱ्या स्तरादरम्यान निश्चित केलेले आहे. तेथून पुढे वाळू बाहेर काढण्यासाठी नियोजित बोगद्याची उभारणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय