अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक ३६ वर्षांचा पुरुष नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि दिवसाची सुरुवात करू लागला. घरातलं अन्न संपलंय त्यामुळे खाण्यासाठी काहीतरी विकत आणा असे पत्नीने त्याला सांगितले. यावर पतीने उत्तर दिले की, आठवडा झाला माझ्याकडे काम नाही... खिशात पैसा नाही...


यावर पत्नीने त्याला उत्तर दिले की, “ सीएसपी सेंटरमध्ये जा आणि तुमचं अकाउंट चेक करा . त्यात काही पैसे असतील. ते काढून रेशन घेऊन या .” पत्नीने सांगितल्याप्रमाणे पती बँकेत गेला. बँकेत जाऊन त्याने तिथल्या स्टाफला खात्यात किती शिल्लक आहे ते विचारले. पुढे म्हणाला... ५०० असतील तर २०० द्या. बँक कर्मचाऱ्याने तपासले तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात ६०० कोटी रुपये जमा होते. हे पाहताच बँक कर्मचाऱ्याला धक्काच बसला, तो व्यक्ती सुद्धा हैराण झाला .


ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राजपूर या गावात घडली आहे आणि पुरुषाचं नाव जितेंद्र साह असं आहे. खात्यात ६०० कोटी आहेत हे कळल्यानंतर जितेंद्र बँक कर्मचाऱ्याला म्हणाला, ‘साहेब 200 रुपये तरी द्या..’ यावर सीएसपी सेंटरचा कर्मचारी म्हणाला, ” जर मी तुला एक रुपयाही दिला तर माझी नोकरी जाईल. तुझ्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावं लागेल.” त्यानंतर पुढच्या २० मिनिटांत त्याचं खातं फ्रिझ केलं जातं.


बँक मॅनेजर आणि पोलिसांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं म्हंटलं आहे आणि त्यावर तपास चालू आहे . गुन्हा उघडकीस येईपर्यंत त्यांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिले आहे, पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Oil Crisis 2026: ३२ देशांचा महत्त्वपूर्ण निर्णय; तेल संकट दूर...

मुंबई: मध्य पूर्व आशियात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. ही

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा