अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका पुरुषासोबत असंच झालं आहे. एक ३६ वर्षांचा पुरुष नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि दिवसाची सुरुवात करू लागला. घरातलं अन्न संपलंय त्यामुळे खाण्यासाठी काहीतरी विकत आणा असे पत्नीने त्याला सांगितले. यावर पतीने उत्तर दिले की, आठवडा झाला माझ्याकडे काम नाही... खिशात पैसा नाही...


यावर पत्नीने त्याला उत्तर दिले की, “ सीएसपी सेंटरमध्ये जा आणि तुमचं अकाउंट चेक करा . त्यात काही पैसे असतील. ते काढून रेशन घेऊन या .” पत्नीने सांगितल्याप्रमाणे पती बँकेत गेला. बँकेत जाऊन त्याने तिथल्या स्टाफला खात्यात किती शिल्लक आहे ते विचारले. पुढे म्हणाला... ५०० असतील तर २०० द्या. बँक कर्मचाऱ्याने तपासले तर संबंधित व्यक्तीच्या खात्यात ६०० कोटी रुपये जमा होते. हे पाहताच बँक कर्मचाऱ्याला धक्काच बसला, तो व्यक्ती सुद्धा हैराण झाला .


ही घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील राजपूर या गावात घडली आहे आणि पुरुषाचं नाव जितेंद्र साह असं आहे. खात्यात ६०० कोटी आहेत हे कळल्यानंतर जितेंद्र बँक कर्मचाऱ्याला म्हणाला, ‘साहेब 200 रुपये तरी द्या..’ यावर सीएसपी सेंटरचा कर्मचारी म्हणाला, ” जर मी तुला एक रुपयाही दिला तर माझी नोकरी जाईल. तुझ्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला याबद्दल पोलिसांना कळवावं लागेल.” त्यानंतर पुढच्या २० मिनिटांत त्याचं खातं फ्रिझ केलं जातं.


बँक मॅनेजर आणि पोलिसांनी याला तांत्रिक बिघाड असल्याचं म्हंटलं आहे आणि त्यावर तपास चालू आहे . गुन्हा उघडकीस येईपर्यंत त्यांना त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन पोलिसांनी कुटुंबाला दिले आहे, पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव

अज्ञात वैमानिकाच्या पत्रात 'इंडिगो'वर ‘गैरव्यवस्थापन,’ आणि ‘अपमान’ केल्याचा आरोप

नवी दिल्ली : देशातील एक विमान सेवा कंपनी सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. गेला

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा