रस्त्यांच्या कडेसह मोकळ्या जागांवर वृक्षरोपणावर अधिक भर

बांबूची झाडे अधिक प्रमाणात लावली जाणार


महापालिका बनवणार बांबूच्या झाडांची नर्सरी


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने आता वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तसेच पर्यावरणदृष्ट्या परिसर हरित राखण्यासाठी रस्त्याच्या कडेसह मोकळ्या जागांमध्ये बांबूची झाडे लावली जाणार आहे. मोकळ्या जागांवर अतिक्रमण होवू नये यासाठी बांबूची झाडे लावणे योग्य ठरणार असून ही बांबूची झाडे केव्हा कापता येत असल्याने अशाप्रकारची झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने बांबूच्या झाडांची नर्सरी तयार केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ अविनाश ढाकणे यांनी सुतोवाच केले आहे.


मुंबईतील पूर्व उपनगरातील रस्त्याच्या कडेला बांबू लावण्याचा प्रकल्प बारगळला असला तरी भविष्यात रस्त्याच्या कडेला झाडे लावण्यात आल्यानंतर कापण्यात येणारे निर्बंध लक्षात घेता बांबूची झाडे लावण्याचा विचार असल्याचे डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले. मुंबईतील अनेक मोकळ्या जागा तसेच रस्त्याच्या कडेला आता बांबूची झाडे लावण्याचा विचार आहे. त्यादृष्टीकोनातून आढावा घेतला जात आहे. मोकळ्या झाडांवर झाडे लावण्याऐवजी बांबू लावल्यास त्याची वाढ जलदगतीने होते, तसेच त्यामुळे पर्यावरणपुरक वातावरण तयार होते, शिवाय हे बांबू कधीही कापून जागा मोकळी करून देता येतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगी लागत नाही. त्यामुळे भविष्यात काही मोकळे भूखंड असल्यास तिथेही बांबू लावले जातील असे डॉ ढाकणे यांनी स्पष्ट केले.





कमी जागेमध्ये जास्त बांबू लागत असल्याने तसेच ते टिकावू असल्याने बांबूची झाडे लावण्यावर भर दिला जाईल. यासाठीच्या जागा निश्चित करण्याच्या सूचना उद्यान विभागाला दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. बांबू केव्हाही काढून टाकता येत असल्याने याची झाडे लावणे सहज सोपे आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलनही राखण्यास मदत होईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. या बांबूसोबतच काही रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर झाडे लावण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार