ठाण्यात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणीकपात

पाइपलाइन फुटल्याने पुरवठा विस्कळीत


ठाणे : कळवा फाटा परिसरात महानगर गॅस कंपनीकडून सुरू असलेल्या कामादरम्यान आठवड्याच्या शेवटी शहराला पाणीपुरवठा करणारी १ हजार मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने ठाणे महापालिकेने शहरात ११ डिसेंबरपर्यंत दररोज ३० टक्के पाणी कपातीची अंमलबजावणी केली आहे. ही जलवाहिनी पीसे धरणातून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी नेते. शनिवारी सकाळी ही गंभीर घटना घडली. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साधारण दोन दिवस दुरुस्तीचे काम सुरू ठेवूनही जलवाहिनी जुनी व प्री-स्ट्रेस्ड काँक्रीटची असल्याने पूर्ण दुरुस्तीला आणखी ३ दिवस लागण्याची शक्यता आहे.


पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात घटल्याने महापालिकेने ११ डिसेंबरपर्यंत झोननिहाय पुरवठा प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे सर्व प्रभागांना तुलनेने समसमान पाणी मिळू शकेल. नागरिकांना कमी दाबाने व अनियमित वेळेत पाणी येण्याची शक्यता असल्याचेही कळवण्यात आले आहे. तसेच, नियमित पुरवठा पूर्ववत होईपर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे. ठाणे महापालिका सुमारे २५ लाख लोकसंख्येसाठी विविध स्रोतांमधून दररोज ५९० एमएलडी पाणी उपसा करते. मात्र, पाइपलाइन नेटवर्कमधील गळती आणि कथित चोरीमुळे प्रत्यक्ष उपलब्धता ही अपेक्षेपेक्षा कमी पडत असल्याचीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच