मनिष तिवारींनी व्हिप विरोधात सादर केले खासगी विधेयक

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार मनिष तिवारींनी व्हिप अर्थात पक्षादेशाविरोधात खासगी विधेयक सादर केले आहे. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रुपांतर होऊ शकते. खरंच असा कायदा झाल्यास भारतीय लोकशाही व्यवस्थेतील पक्षादेश इतिहासजमा होईल. जर पक्षादेशाविरोधात कायदा झाला तर कोणत्याही पक्षाचा खासदार हा त्याच्या मर्जीने एखाद्या विधेयकावर स्वतंत्र मतदान करू शकेल. पक्षादेश काढला तरी तो कोणत्याही खासदाराला बंधनकारक नसेल. पक्षादेशाचे उल्लंघन केले म्हणून कोणत्याही खासदाराची खासदारकी रद्द होणार नाही. ही व्यवस्था भारतीय लोकशाहीत नव्या क्रांतीला जन्म देण्याची शक्यता आहे.


मनिष तिवारी यांनी संविधानाच्या १० व्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती सुचविण्यासाठी खासगी विधेयक सादर केले आहे. संविधानातील १० व्या अनुसूचीला 'पक्षांतर विरोधी कायदा' म्हणून ओळखतात. या कायद्याविरोधात मनिष तिवारी यांनी खासगी विधेयक सादर केले आहे.


व्हिप अर्थात पक्षादेश प्रत्येक बाबतीत लोकप्रतिनिधींना लागू होऊ नयेत. पक्षादेश सरकारच्या स्थिरतेशी संबंधित बाबींपुरते मर्यादित असावेत.


विश्वास प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव, स्थगिती प्रस्ताव आणि आर्थिक विधेयके यांच्या बाबतीत पक्षादेश अर्थात व्हिपचे बंधन असावे. पण इतर विधेयकांच्या बाबतीत लोकप्रतिनिधींना पक्षादेश अर्थात व्हिपचे बंधन नसावे. या विधेयकांवर मतदान करताना लोकप्रतिनिधींना त्यांच्या मर्जीने एखाद्या विधेयकावर स्वतंत्र मतदान करता येईल; अशी तरतूद सुचविणारे खासगी विधेयक मनिष तिवारींनी सभागृहात सादर केले आहे.


सध्याची व्हिप अर्थात पक्षादेशाला अनुकूल अशी भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी नावाचे रोबो (यंत्रमानव) तयार करण्यापेक्षा प्रसंगी स्वतंत्र विचार करणारे लोकप्रतिनिधी देशहिताचे आहेत, अशी भूमिका मिनिष तिवारी यांची आहे. तिवारींनी सुचवलेली दुरुस्ती जशीच्या तशी लागू झाली तरी सरकारच्या स्थैर्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही. यामुळेच तिवारींनी लोकप्रतिनिधींना स्वतंत्र विचार करण्याची संधी मिळेल, असे सांगत खासगी विधेयक सादर केले आहे.

Comments
Add Comment

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या

विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री ?

नागपूर : ‘मनात मांडे, पदरात धोंडे’, अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीला ती तंतोतंत

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशात अव्वल'

नागपूर : "विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवायची घाई झालेली आहे. पण, राज्याची आर्थिक स्थिती ओढाताणीची असली तरी

गोव्यात नाईटक्लबमध्ये अग्नितांडव, २५ जणांचा मृत्यू; चौघांविरोधात FIR, मॅनेजरला अटक

पणजी : उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील 'बिर्च बाय रोमियो लेन' या नाईटक्लबमध्ये रविवारी मध्यरात्रीनंतर लागलेल्या

कारवाई का करू नये ? केंद्र सरकारची 'इंडिगो'ला नोटीस

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्समधील ऑपरेशनल संकट दूर करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी