बुरख्याच्या परवानगीसाठी आंदोलन

मुंबई  : गोरेगावमधील विवेक एज्युकेशन सोसायटीच्या विवेक विद्यालय-कनिष्ठ महाविद्यालयाने कपड्यांबाबत आचारसंहिता जाहीर केली असून विद्यार्थ्यांना धार्मिक पेहराव करून येण्यास बंदी घातली आहे. त्यानुसार महाविद्यालयात बुरखा-नकाब घालून येण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाविरोधात मुस्लम विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर येथे असलेल्या विवेक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता लागू केली. त्यात महाविद्यालयात येण्याच्या वेळा, प्रवेशद्वार बंद होण्याच्या वेळा याचबरोबर विद्यार्थ्यांनी कोणते पोशाख घालणे टाळावे, हे नमूद केले. या पत्रकात धार्मिक पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार मुस्लिम मुलींना बुरखा आणि नकाब परिधान करण्यास बंदी घातली आहे. मात्र हिजाब घालण्यास परवानगी दिली आहे.


या निर्णयाविरोधात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी आम्ही येथे शिकायला येतो. आम्ही नकाब किंवा बुरख्यात जास्त सहजपणे वावरू शकतो. आमचा पोशाख आमच्या शिक्षणाच्या आड कसा येऊ शकतो, असा प्रश्न या विद्यार्थिनींनी उपस्थित केला.


एमआयएमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला, तसेच मनसेने सुद्धा महाविद्यालयामध्ये धार्मिक बाबी आणू नयेत अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला. एमआयएमच्या आणि मनसेच्या सहभागामुळे या मुद्द्याने राजकीय स्वरूप धारण केले आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्य शिजा मेनन यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. तसेच आमच्या वकिलांनी आंदोलनकर्त्या मुलींनाही उत्तर दिले असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,