मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड पर्यंतविस्तारित पुलाच्या कामाचा खर्च तब्बल ४० कोटींनी वाढला गेला. आतापर्यंत या विस्तारित पुलाच्या वाढीव खर्च तीन वेळा वाढवला गेला आहे. २०९ कोटी रुपयांवरून या प्रकल्पाचा खर्च २४८ कोटी रुपयांवर पोहोचला गेला आहे. मात्र, या वाढीव कामांबाबत कंत्राटदार आणि सल्लागारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आल्याने आता अखेर स्थायी समितीच्यावतीने या विस्तारीत पुलाची प्रत्यक्षात जावून पाहणी केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि सल्लागार कंपनी यांनाच पाचारण करून स्थायी समितीचे सदस्य हे त्यांची शाळा घेणार आहे.


गोरेगाव पूर्व येथील मृणालताई गोरे उड्डाणपूलाच्या विस्तारीत बांधकामातील कंत्राट कामांच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मागील चर्चेला आला असता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी जुना आणि नवीन पुलाच्या बांधकामाचा हा प्रस्ताव असून जुना पूल वापरात नाही, त्यामुळे याचा खुलासा करावा अशी मागणी केली. तर हे काम आठ वर्षांपसाून सुरु आहे. अंधेरी ते गोरेगाव जाण्यासाठी अर्धा ते पाऊणतासाचा वेळ जात आहे. त्यामुळे याचे जर तीन वेळा व्हेरिएशन येत असेल तर याची प्रत्यक्ष जागी जावून पाहणी करावी अशी मागणी यशोधर फणसे यांनी केली.


तर भाजपच्या प्रिती सातम यांनी कंत्राट कामाच्या वाढीव खर्चाला दिलेल्या कारणावर आक्षेप नोंदवला. जागेची उपलब्धता आणि कार्यपध्दतीमुळे हा खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे सल्लागार डोळे बंद करून आराखडा बनवतात का असा सवाल करून कंत्राटदारांच्या वाढीव खर्चावर सल्लागारांना वाढीव शुल्क देण्यात येवू नये, सल्लागारांना मुळ कंत्राट कामाचेच शुल्क देण्यात यावे अशी सूचना केली. शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनीही याची प्रत्यक्ष पाहणीची मागणी केली, तर अश्रफ आझमी यांनी सल्लागारांच्या माध्यमातून अभियंत्यांमधील कौशल्य डॅमेज केले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवत याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल असे जाहीर केले.



महापालिकेतील रावसाहेब आणि भाऊसाहेब



महापालिकेत अधिकारी आणि सल्लागारांचा उल्लेख रावसाहेब आणि भाऊसाहेब असा करत सभागृहनेते गणेश खणकर यांनी पुलाच्या विस्तारीत कामाची पाहणी दरम्यान या रावसाहेब आणि भाऊसाहेबांनाच तिथे बोलावले जावे,अशी सूचना केली. त्यामुळे कंत्राटदाराला तिथे न बोलावता रावसाहेब आणि भाऊसाहेबांना तिथे बोलावतून त्यांच्याकडून या वाढीव खर्चाची कारणे जाणून घेतली जावीत अशी सूचना केली.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! घाटमाथा आणि विदर्भातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या उन-पावसाच्या लपंडावानंतर आता मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस,