गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. या धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि डॉग स्क्वॉडद्वारे सखोल तपासणी करण्यात येत आहे. गुडीपाडवा सण देखील आहे, त्यामुळे या घटनेने आणखीणच खळबळ वाढली आहे. तसेच यामुळे मुंबई अलर्टवर असणार आहेत.


मुंबईतील बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. सायनाइड गॅसद्वारे स्फोट घडवण्याचा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आला आहे. ही धमकी मिळताच पोलिसांचा तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांपाठोपाठ बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाली असून सखोल तपासणी सुरू आहे.


दरम्यान क्राईम ब्रांचची टीमही तपासात सहभागी झाली आहे. या तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तसेच परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे आणि पोलिसांचा सतत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने परिसरात अलर्ट असणार आहे.


या घटनेत नेमका धमकीचा हा ईमेल कुणी पाठवला याचा शोध घेतला जात आहे. तसेच तपास यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे आता पोलिसांना ईमेल पाठवणाऱ्याचा शोध लागतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील