भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी कौशल्य विकास, लघुउद्योजकता प्रोत्साहन, डिजिटल सक्षमीकरण आणि स्थानिक रोजगार निर्मिती या उद्देशाने नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पालिका मुख्यालयात करण्यात आला. हा करार महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर आणि एमसीईडीचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरीत झाला. या उपक्रमांतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या गरजू, उद्योजकतेची इच्छा असलेल्या आणि प्रगतिशील महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रारंभी २१ वर्षे वयावरील ५०० महिलांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, उपायुक्त (समाजकल्याण)विक्रम दराडे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख मिलिंद पळसुळे तसेच एमसीईडीचे विभाग प्रमुख - समन्वय प्रदीप इंगळे उपस्थित होते.


पालिकेच्या महिला कल्याण विभागांतर्गत खालील गटांतील महिलांना प्रशिक्षणाची संधी :




  1. वंचित व अल्पसंख्याक समुदायातील महिला

  2. पुनर्वसनाची गरज असलेल्या देहव्यापारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महिला

  3. शिक्षण सोडलेल्या शाळा/महाविद्यालयीन तरुणी

  4. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी


प्रशिक्षणातील ६ मुख्य ट्रेड:


फॅशन / ज्वेलरी डिझाईन
बुटीक, ब्युटी आणि वेलनेस सेवा
फूड प्रोसेसिंग व पाककला उत्पादने
हस्तनिर्मित साबण, मेणबत्त्या, नॅपकिन, बुके आणि अरोमा उत्पादने
पॉवरलूम आधारित कौशल्य विकास
लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आणि डेटा एन्ट्री.

Comments
Add Comment

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.