भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी कौशल्य विकास, लघुउद्योजकता प्रोत्साहन, डिजिटल सक्षमीकरण आणि स्थानिक रोजगार निर्मिती या उद्देशाने नुकताच एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार पालिका मुख्यालयात करण्यात आला. हा करार महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर आणि एमसीईडीचे कार्यकारी संचालक विक्रांत बगाडे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरीत झाला. या उपक्रमांतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या गरजू, उद्योजकतेची इच्छा असलेल्या आणि प्रगतिशील महिलांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रारंभी २१ वर्षे वयावरील ५०० महिलांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शनही दिले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी अतिरिक्त आयुक्त नयना ससाणे, उपायुक्त (समाजकल्याण)विक्रम दराडे, महिला व बाल विकास विभाग प्रमुख मिलिंद पळसुळे तसेच एमसीईडीचे विभाग प्रमुख - समन्वय प्रदीप इंगळे उपस्थित होते.


पालिकेच्या महिला कल्याण विभागांतर्गत खालील गटांतील महिलांना प्रशिक्षणाची संधी :




  1. वंचित व अल्पसंख्याक समुदायातील महिला

  2. पुनर्वसनाची गरज असलेल्या देहव्यापारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महिला

  3. शिक्षण सोडलेल्या शाळा/महाविद्यालयीन तरुणी

  4. नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी


प्रशिक्षणातील ६ मुख्य ट्रेड:


फॅशन / ज्वेलरी डिझाईन
बुटीक, ब्युटी आणि वेलनेस सेवा
फूड प्रोसेसिंग व पाककला उत्पादने
हस्तनिर्मित साबण, मेणबत्त्या, नॅपकिन, बुके आणि अरोमा उत्पादने
पॉवरलूम आधारित कौशल्य विकास
लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आणि डेटा एन्ट्री.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये