कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कल्याण शहर हादरले आहे. आणखी एक मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



मोहने गाळेगावमध्ये भीषण प्रकार


मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात रस्त्यावर खेळणाऱ्या दोन मुलांवर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान सात वर्षीय खुशील वाघे याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.



महापालिकेकडे तातडीच्या कारवाईची मागणी


घटनेनंतर स्थानिक प्रतिनिधींनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडे धाव घेतली. परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचा मुद्दा उपस्थित करत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची मागणी करण्यात आली. सोसायट्यांच्या आवारातही हल्ल्यांच्या घटना वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे.



पूर्वीची घटना अद्याप ताजी


दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी कल्याण पूर्व भागात ३० वर्षीय आयश विश्वनाथ अमीन याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आवश्यक उपचार पूर्ण न केल्यामुळे त्याला रेबिजची लक्षणे जाणवू लागली आणि भीती आणि त्रासामुळे आत्महत्या केली.



नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी ठोस आणि तातडीची उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत आवश्यक पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mahayuti : महायुतीसमोर बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज; नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुण्यात कुरघोड्या मुंबई : राज्यातील प्रदीर्घ

MIDC : मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीत नोकरी

जिल्हाधिकाऱ्यांना वारसांच्या पडताळणीचे निर्देश; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी मुंबई : मराठा

Weater Update : राज्यातील २३ जिल्ह्यांना हायअलर्ट, मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

मुंबई : पुढील २ दिवसांमध्ये केरळसह तमिळनाडूमध्ये मान्सून धडक मारण्याची शक्यता आहे. तर राज्यात पावसाला पोषक

Election : राज्यसभा आणि राज्य विधान परिषदा 2026 च्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) तीन राज्यांतील विधान परिषदांच्या (आमदारांतर्फे होणाऱ्या) द्वैवार्षिक

Nitesh Rane : अनिकेत तटकरे यांच्या विजयात भाजपाचा सिंहाचा वाटा असेल : नितेश राणे

मुंबई : कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pratap Sarnaik: स्वच्छ, हरित आणि सक्षम एसटी घडवण्याचा संकल्प;

७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री प्रताप