भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे


ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे तीन हजार नागरिकांनी संबंधित विकासकाकडे ८० टक्क्यांहून अधिक रक्कम दिली. गेल्या १५ वर्षांत विकासक घरे देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. आज या कुटुंबांने आमदार संजय केळकर यांची भेट घेत त्यांना याप्रकरनी मदत करण्यासाठी साकडे घातले. खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित 'जनसेवकाचा जनसंवाद' या कार्यक्रमात सदर कुटुंबाने आ.केळकर यांना निवेदन दिले. आ. केळकर यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.न्याय मिळत नाही तोपर्यंत सदर कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.


सन २०११ ते २०१७ या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायेगाव येथे इमारत बांधकाम सुरू होते. कमी दरात घरे आणि दुकानाचे गाळे देण्याचे आमिष विकासकाने दाखवल्याने काही जणांनी गुंतवणुक करत ८० टक्के रक्कम जमा केली. मात्र त्यांना घरे मिळाली नाहीत. दरम्यान विकासकाने बनावट शासकीय कागदपत्रे करून बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्याने २०१५ साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, या प्रकल्पात सुमारे ३ हजार नागरिकांनी १०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे नागरिकांनी सांगितले.


सदर विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने लोक हवालदिल झाले आहेत. आ. केळकर म्हणाले कि, ''या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप सरकारी वकील देण्यात आलेला नाही.


विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे.'' यावेळी माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, महेश कदम, ॲड. अल्केश कदम आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी