नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा


मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली आहे. मात्र त्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. म्हाडाने ही घरे उभारली असून संपूर्ण काम झाले आहे. संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळाली आहे. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असल्याने म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावीवाटप रखडले असल्याची चर्चा आहे.


वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टॉवर क्र. ४ ते ८ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८६४ रहिवाशांना चावीवाटप केले जाणार आहे.


सुरुवातीला दिवाळीत संबंधित रहिवाशांना चावीवाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणामुळे ओसी न मिळाल्याने तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओसी येताच म्हाडाने चावीवाटपाची तयारी करीत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानुसार सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्याला आता १५ दिवस झाले तरी चावीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे नव्या घरांचा ताबा कधी मिळणार, याकडे बीडीडीवासीयांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील