नायगाव बीडीडीवासीयांचा गृहप्रवेश लांबणीवर

८६४ रहिवाशांना घरांची प्रतीक्षा


मुंबई  : वरळी बीडीडीच्या साडेपाचशे रहिवाशांना घराचा ताबा दिल्यानंतर आता नायगाव बीडीडीच्या जागेवरील ८६४ रहिवाशांना घराची प्रतीक्षा लागली आहे. मात्र त्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. म्हाडाने ही घरे उभारली असून संपूर्ण काम झाले आहे. संबंधित इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रही (ओसी) मिळाली आहे. मात्र सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असल्याने म्हाडाला मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने चावीवाटप रखडले असल्याची चर्चा आहे.


वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. ८ मधील टॉवर क्र. ४ ते ८ या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून, ८६४ रहिवाशांना चावीवाटप केले जाणार आहे.


सुरुवातीला दिवाळीत संबंधित रहिवाशांना चावीवाटप करण्याचे म्हाडाचे नियोजन होते, मात्र तांत्रिक कारणामुळे ओसी न मिळाल्याने तो मुहूर्त हुकला होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओसी येताच म्हाडाने चावीवाटपाची तयारी करीत मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती. त्यानुसार सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र काही कारणास्तव ऐनवेळी ती रद्द करण्यात आली. त्याला आता १५ दिवस झाले तरी चावीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे नव्या घरांचा ताबा कधी मिळणार, याकडे बीडीडीवासीयांचे डोळे लागले आहेत.

Comments
Add Comment

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला