दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय मालिकेत घेणार ?

रांची : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये दुपारी १:३० वाजता सुरू होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी जिंकली. दोन्ही सामन्यात भारताचा लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवाचा बदला भारत एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकून घेणार का ? याचीच सध्या चर्चा आहे.


सलामीची जोडी म्हणून भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हेच खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकजण चौथ्या क्रमांकावर तर पाचव्या क्रमांकावर केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.


वेळापत्रकानुसार रविवार ३० नोव्हेंबर २०२५ पासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना झारखंडमधील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १:३० वाजता सुरू होईल.


भारत आणि दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यांमध्ये ९४ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ९४ पैकी ५१ सामने जिंकले आहेत तर भारतीय संघाने ४० सामने जिंकले आहेत आणि तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघाने घरच्या मैदानावर १८ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने २६ सामने जिंकले आहेत. परदेशात, भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १४ सामने जिंकले आहेत. तटस्थ ठिकाणी झालेल्या सामन्यांपैकी १० सामने भारताने आणि ११ सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.


एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ


केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह और ध्रुव जुरेल


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका




  1. पहिला सामना - ३० नोव्हेंबर २०२५ - रांची, झारखंड

  2. दुसरा सामना - ०३ डिसेंबर २०२५ - रायपूर, छत्तीसगड

  3. तिसरा सामना - ०६ डिसेंबर २०२५ - विशाखापट्टणम (वायझॅग), आंध्र प्रदेश

Comments
Add Comment

Hardik Pandya : आयपीएल संपण्याआधीच हार्दिक पांड्या पुन्हा लग्न करणार ? सोशल मीडियावर चर्चांना उधाण , सत्य काय?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली

RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट

RR : राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील

IPL 2026 : प्लेऑफसाठी विजय महत्त्वाचा!

आयपीएल रणसंग्राम - सुशील परब आययपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील ६१ वा सामना

KKR : कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ!

कोलकाता : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात