भारतातून अफगाणिस्तानला ७३ टन मदत रवाना

नवी दिल्ली : पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विशेष विमानाने रवाना केली आहे. या मदतीत औषधांचा साठा, लसचा साठा, अनेक अत्यावश्यक पदार्थ आहेत. ही मदत अफगाणिस्तान सरकारच्या आरोग्य विभागाला सुपूर्द करण्यात आली आहे. भारताकडून मिळालेल्या मदतीसाठी अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.



भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्री अधिकाधिक घट्ट होत असल्याचे पाहून पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तान हल्ले करत असताना भारताकडून मिळालेली मदत हा अफगाणिस्तानसाठी मोठा आधार आहे. पण पाकिस्तानच्या सरकारमध्ये भारत करत असलेल्या मदतीमुळे प्रचंड अस्वस्थता आहे.

पाकिस्तानने केलेल्या एका हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये एक महिला आणि नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी उत्तर देऊ असे अफगाणिस्तानने जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विमानातून पाठवली आहे. याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताने अफगाणिस्तानला औषधांचा मोठा साठा, लसचा साठा आणि वीस सुसज्ज रुग्णवाहिकांचा ताफा ही मदत पाठवली होती. भारताने अफगाणी नागरिकांसाठी सहा कल्याणकारी वैद्यकीय योजना सुरू केल्या आहेत. या योजनांसाठीही अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला