शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर तुमच्यासाठी ही अत्यंत बातमी महत्त्वाची आहे. कायम धावपळीत असणाऱ्या आपल्या आयुष्यात बँकेची कामं आपण अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत ढकलतो.


जर तुमचं असं काही काम अडकलं असेल, तर आता उशीर करू नका. कारण उद्यापासून बँकांवर 'होळी' आणि 'विकेंड'चा असा काही रंग चढणार आहे की, सलग पाच दिवस बंद राहू शकतात.


होळीनिमित्ताने पुन्हा एकदा आरबीआयने सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शनिवार आणि रविवार शेवटचा असल्याने दोन दिवस बँक बंद राहतील. २ मार्च होलिका दहन असल्याने काही ठराविक राज्यात बँका बंद राहतील.


३ मार्च धुलिवंदन आणि डोल जत्रा निमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत बँकांचे कामकाज होणार नाही. ४ मार्च होळीचा मुख्य सण असल्याने देशाच्या बहुतांश भागात बँकांना सुट्टी असेल.होळीच्या सणामुळे घराघरात आनंदाचं वातावरण असणार आहे, सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे.


खिशात ऐनवेळी पैसे नसतील तर अडचणीत सापडू शकता. बँका बंद असल्या तरी ATM सेवा सुरू राहील, पण सलग सुट्ट्यांच्या काळात अनेकदा एटीएममधील कॅश संपण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शक्य असल्यास आजच आवश्यक तितके पैसे काढून ठेवा.


या कालावधीमध्ये यूपीआय (UPI) सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे पैसे पाठवण्याचे व्यवहार तुम्ही करू शकता. फक्त चेक क्लिअरन्स किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायची कामं असतील, तर मात्र तुम्हाला ४ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रत्येक शहरात स्थानिक सणानुसार सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो. त्यामुळे आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन किती दिवस आणि कशी सुट्टी असणार याची माहिती करून घ्या.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व