RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत आहेत. या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पाऊले उचलली आहेत. याबाबत नितीन गडकरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.



ड्रायव्हिंग लायसन्स बनेल ‘रिपोर्ट कार्ड’


नव्या योजनेनुसार प्रत्येक चालकाच्या लायसन्सवर गुण प्रणाली (पॉइंट्स सिस्टिम) लागू केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकाच्या लायसन्सवरील ठराविक गुण कमी केले जातील. जर हे गुण ठराविक मर्यादेपेक्षा खाली गेले, तर चालकाचे लायसन्स सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. म्हणजेच त्या कालावधीत वाहन चालवण्यास बंदी असेल.



वारंवार चुका केल्यास कायमस्वरूपी रद्द


गंभीर नियमभंग किंवा वारंवार केलेल्या उल्लंघनांवर अधिक कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांत संबंधित व्यक्तीचे लायसन्स कायमचे रद्द करण्याची तरतूदही असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा परवाना मिळवणे कठीण होऊ शकते.



या उल्लंघनांवर कारवाई ठरणार कठोर


खालील प्रकारच्या चुका वाहनचालकांना महागात पडू शकतात:


वेगमर्यादा ओलांडून वाहन चालवणे
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर
चुकीच्या दिशेने (राँग साईड) वाहन चालवणे
मद्यपान करून वाहन चालवणे

Comments
Add Comment

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला

Gandak River : गंडक नदीची पाणीपातळी घटली; बिहारवरील पुराचा धोका टळला

नेपाळ आणि बिहारमधील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. गंडक म्हणजेच नारायणी नदीची पाणीपातळी वेगाने कमी होत