खाडीत सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपीचा शोध सुरु

कल्याण : कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीळ रोडलगतच्या देसाई खाडीत एका सुटकेसमधून तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात वाढत्या खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणीचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षे दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून खाडीत टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून फॉरेन्सिक टीमकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अद्याप मृत तरुणीची ओळख पटलेली नसून, हेच पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे.


तरुणीची ओळख नसल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड झाले आहे. यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर शक्यता तपासत आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.