खाडीत सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपीचा शोध सुरु

कल्याण : कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीळ रोडलगतच्या देसाई खाडीत एका सुटकेसमधून तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात वाढत्या खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणीचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षे दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून खाडीत टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून फॉरेन्सिक टीमकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अद्याप मृत तरुणीची ओळख पटलेली नसून, हेच पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे.


तरुणीची ओळख नसल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड झाले आहे. यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर शक्यता तपासत आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच