खाडीत सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह; आरोपीचा शोध सुरु

कल्याण : कल्याण परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीळ रोडलगतच्या देसाई खाडीत एका सुटकेसमधून तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात वाढत्या खून प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणीचे वय अंदाजे 28 ते 30 वर्षे दरम्यान असल्याचे सांगितले जाते. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून खाडीत टाकण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून फॉरेन्सिक टीमकडून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. डाकघर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. अद्याप मृत तरुणीची ओळख पटलेली नसून, हेच पोलिसांसाठी सर्वात मोठे आव्हान बनले आहे.


तरुणीची ओळख नसल्याने आरोपीचा शोध घेणे अवघड झाले आहे. यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर शक्यता तपासत आहेत. पुढील काही तासांत किंवा दिवसांत या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Comments
Add Comment

Thane Metro : वडाळा ते कासारवडवली प्रवास आता सुसाट! मेट्रो ४ मुळे मुंबई-ठाणे येणार अधिक जवळ, मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितला पूर्ण 'प्लॅन'

ठाणे : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मेट्रो लाईन ४

शिवसेनेच्या प्रचारात ‘नवी मुंबई, नवे सरकार’ची घोषणा

नवी मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील राजकारण चांगलेच तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७ जानेवारीला ठाण्यात येत आहेत.

उल्हासनगरमध्ये २० प्रभाग; ७८ जागांसाठी ४३२ उमेदवारांमध्ये सामना

पालिका निवडणुकीचा बहुरंगी महासंग्राम उल्हासनगर : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील

अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची युती

बहुमतासाठी अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेचा 'गेम' करण्याची रणनिती अंबरनाथ : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत

७२ तासांत बदलले तीन पक्ष; मतदार राजाही संभ्रमात!

उल्हासनगर : उल्हासनगरमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये अवघ्या ७२ तासांत घडलेल्या एका प्रकाराने महापालिका