पुण्यात वाढतेय बिबट्याची दहशत! औंधनंतर आता धानोरीमध्ये बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात दिसणाऱ्या बिबट्यांची एन्ट्री आता शहरात झाली आहे. पुण्यातील औंध शहरात बिबट्यांच्या वाढत्या संख्येनंतर आता धानोरी परिसरातील मुंजाबावस्ती येथेही बिबट्याचे दर्शन घडले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच, वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली आहे.



धानोरीच्या निवासी भागात पहाटेच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहे. हे फुटेज समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. हा बिबट्या पहाटे एकदा दिसल्यानंतर परत कुठेच दिसला नाही. ज्यामुळे तो जवळच्या संरक्षण वनक्षेत्रांमधून आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


वनविभागाने मुंजाबावस्ती आणि नजीकच्या लोहगाव तसेच पुणे विमानतळ परिसराच्या हद्दीतही बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरे आणि कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत. वनविभागाने बिबट्याचा शोध पूर्ण होईपर्यंत मुंजाबावस्ती आणि आसपासच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही नवीन माहिती किंवा बिबट्याचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यास तातडीने वनविभागाला संपर्क साधण्याचे निर्देश दिले आहेत.




पुणे शहरातील औंध भागातही नुकतेच बिबट्याचे दर्शन झाले होते. एका सोसायटीच्या आसपास बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. शहराच्या मध्यवर्ती भागात स्थानिकांना बिबट्या आढळून आल्याने पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे