ठाण्यात हिवाळ्यात उष्म्याचा कहर! तापमान ३५° अंशाच्या पुढे

उष्मा आगामी दोन-तीन दिवसांत आणखी वाढण्याचे संकेत


ठाणे : जोमदार पावसामुळे यंदाच्या हिवाळ्यात आल्हाददायक गारवा जाणवेल, अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यात उष्म्याने अक्षरशः कहर केला असून गुरुवारी शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत नोंदवला त्यामुळे ऐन थंडीत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा ठाणेकरांच्या अंगावर पडला आहे.


गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात सातत्याने भर पडत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ३०° सेल्सियसपासून थेट ३५ ° पर्यंतच्या उडीनं हिवाळ्याची चाहूलच हरवली आहे.


येत्या ४८ ते ७२ तासांत तापमान आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पहाटे हलकीशी थंडी आणि दुपारी डोळ्यांत आग ओकणारा उन्हाचा तडाखा ठाणेकर या विसंगत हवामानाला अक्षरशः कंटाळले आहेत. जमिनीतील ओलावा, सूर्याची तीव्रता आणि कोरडे गरम वारे, यामुळे तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. “सध्या दिसत असलेली तापमानवाढ तात्पुरती आहे. काही दिवसांत पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल. जमिनीतील ओलावा आणि हवामानातील बदलांमुळे हा उकाडा वाढला आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे.


ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील तापमान नोंद


दिनांक          कमाल    किमान
२१ नोव्हेंबर    ३३.२       २१.६
२२ नोव्हेंबर    ३४.२      २२.७
२३ नोव्हेंबर    ३४.७     २३.६
२४ नोव्हेंबर    ३४.८     २३.७


Comments
Add Comment

ठाणेकरांच्या अंतर्गत प्रवासाला मिळणार गती

ठाणे वर्तुळाकार मेट्रोसाठी २२३ कोटींची निविदा ठाणे : ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र

ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग

उल्हास खाडी प्रदूषित रसायनांचा साठा जप्त

ठाकुर्लीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडू्न कारवाई डोंबिवली  : डोंबिवलीजवळील ठाकुर्ली, कचोरे गाव हद्दीतील

हत्या केली मात्र अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी केला चक्क सापाचा वापर; कशी केली काँग्रेस महिला पदाधिकाऱ्याची हत्या?

बदलापूर: महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या काँग्रेस महिला पदाधिकारी नीरजा

स्मार्ट सिटीतील प्रकल्प रखडला, कल्याणकरांची प्रतीक्षा वाढली; उड्डाणपूल कधी खुला होणार?

कल्याण : कल्याण शहरात वाढती लोकसंख्या आणि त्यासोबतच वाढलेली वाहनसंख्या यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न

भिवंडीतील ट्रॅफिकवर कायमस्वरूपी तोडगा; १० एकर जागेवर विशेष व्यवस्था, मंत्री मेघा बोर्डीकर यांची घोषणा

नागपूर : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा मुंबईपर्यंतचा विस्तार आणि ठाणे-भिवंडी परिसरातील