ठाण्यात हिवाळ्यात उष्म्याचा कहर! तापमान ३५° अंशाच्या पुढे

उष्मा आगामी दोन-तीन दिवसांत आणखी वाढण्याचे संकेत


ठाणे : जोमदार पावसामुळे यंदाच्या हिवाळ्यात आल्हाददायक गारवा जाणवेल, अशी अपेक्षा नागरिकांनी ठेवली होती. मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यात उष्म्याने अक्षरशः कहर केला असून गुरुवारी शहराचा कमाल पारा ३५ अंश सेल्सियस पर्यंत नोंदवला त्यामुळे ऐन थंडीत ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा ठाणेकरांच्या अंगावर पडला आहे.


गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात सातत्याने भर पडत असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. ३०° सेल्सियसपासून थेट ३५ ° पर्यंतच्या उडीनं हिवाळ्याची चाहूलच हरवली आहे.


येत्या ४८ ते ७२ तासांत तापमान आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पहाटे हलकीशी थंडी आणि दुपारी डोळ्यांत आग ओकणारा उन्हाचा तडाखा ठाणेकर या विसंगत हवामानाला अक्षरशः कंटाळले आहेत. जमिनीतील ओलावा, सूर्याची तीव्रता आणि कोरडे गरम वारे, यामुळे तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. “सध्या दिसत असलेली तापमानवाढ तात्पुरती आहे. काही दिवसांत पारा खाली येऊन चांगली थंडी पडेल. जमिनीतील ओलावा आणि हवामानातील बदलांमुळे हा उकाडा वाढला आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे.


ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील तापमान नोंद


दिनांक          कमाल    किमान
२१ नोव्हेंबर    ३३.२       २१.६
२२ नोव्हेंबर    ३४.२      २२.७
२३ नोव्हेंबर    ३४.७     २३.६
२४ नोव्हेंबर    ३४.८     २३.७


Comments
Add Comment

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी