मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. लहान मुलांच्या डोळ्यांवर दिसणारे चष्म्याला मोबाइल फोन स्क्रीनचा अतिवापराला कारणीभूत ठरवले जाते. मात्र भारतातील प्रमुख महानगरांमध्ये (मेट्रो शहरांमध्ये) डॉक्टरांना मुलांमध्ये लहान मुलांमध्येही मायोपिया (जवळचे कमी दिसणे) समस्या आढळून येत आहेत. आता देशातील महानगरांमधील नेत्ररोग तज्ज्ञांनी खराब हवेमुळे हा विकार मुलांमध्ये वाढत असल्याचे स्पष्ट केले आहे.


दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, बंगळूरु आणि इतर प्रदूषित महानगरांमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे की, मुलांमध्ये मायोपिया (जवळचे कमी दिसणे) पूर्वीपेक्षा खूप लवकर विकसित होत आहे. अशा मुलांच्या संख्येत होणारी वाढ ही काळजी वाढविणारी आहे. डोळ्यांसाठी हानिकारक असणारे हवेतील लहान कण, कमी झालेला दिवसाचा प्रकाश याचा शहरी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास केला जात आहे.


पूर्व आशियामध्ये मायोपियाने आधीच साथीचे रूप घेतले आहे. जागतिक आरोग्य संस्था यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, सध्याचे महानगरांधील हवेची गुणवत्ता अशीच खालावत राहिल्यास भारतही त्याच दिशेने जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संस्थांचा अंदाज आहे की, २०५० पर्यंत जगातील अर्धी लोकसंख्या मायोपियाने ग्रस्त असेल. यासाठी पर्यावरणीय घटक मोठी भूमिका बजावतील. अभ्यासातून हे देखील दिसून आले आहे की, घराबाहेर घालवलेला कमी वेळ आणि नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात कमी येणे, या दोन्ही गोष्टींवर वायू प्रदूषणाचा मोठा परिणाम होतो, ज्यामुळे लहान मुलांमध्ये लवकर मायोपिया होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या