आताची सर्वात मोठी बातमी: 'या' तीन कंपन्यांचे लवकरच विलीनीकरण? त्यानंतर खाजगीकरण? - सुत्र

प्रतिनिधी: जुलै २०२० मध्ये प्रस्तावित झालेली विमा कंपनीच्या विलीनकरणावर चर्चा काही कारणास्तव थांबलेली होती. मात्र पुन्हा एकदा याविषयी चर्चा सुरू झाल्याने पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा एकदा ओरिएंटल इन्शुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स या तिन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होऊ शकते याविषयी सरकार पुन्हा सकारात्मक विचार करत असून याविषयी मोठ्या पातळीवर विचार मंथन होऊ शकते. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी तिन्ही कंपन्यांचे अर्थकारण, सरकारची वित्तीय प्रणाली यांचा विचार करुनच पुढील निर्णय वित्त मंत्रालय घेऊ शकते‌ अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे.


सध्या ही चर्चा पुढील पातळीवर गेली नसली तरी प्राथमिक पातळीवर सुरू आहे. वित्त मंत्रालयाने अद्याप यावर कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे याविषयी अनिश्चितता कायम असली तरी या चर्चेत पुन्हा वेग आल्याने विविध स्तरांवरून विविध प्रतिसाद येत आहेत. तिन्ही कंपन्यांची अर्थक्षमता, उत्पादकता (Productivity), कार्यक्षमता (Efficiency) वाढण्यासाठी सरकार या विलीनीकरणचा गांभीर्याने विचार करत आहे. पीएसयु कंपनी असलेल्या या तिन्ही कंपन्यांत १७४५० रूपये गुंतवणूक सरकारने केली होती. अर्थमंत्री म्हणून अरूण जेटली यांनी कार्यभार सांभाळला असताना २०१८-२०१९ सालीच्या अर्थसंकल्पात तिन्ही कंपन्यांचे विलिनीकरण होईल असे वक्तव्य केले होते. मात्र त्यानंतर सरकारने ही कल्पना मागे घेत त्याऐवजी जुलै २०२० मध्ये १२४५० कोटींची भांडवली गुंतवणूक या विमा कंपन्यात केली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे, वित्त मंत्रालय या संस्थांच्या विलीनीकरणाचे प्राथमिक मूल्यांकन केले. तसेच सुत्रांच्या माहितीनुसार सरकारने जाहीर केलेल्या सामान्य विमा कंपनीचे खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावाची तपासणी केली जात आहे असे सूत्रांनी सांगितले. विविध पर्यायांवर चर्चा सुरू आहे, परंतु अद्याप काहीही निश्चित झालेले नाही.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ सालच्या अर्थसंकल्पात दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एका सामान्य विमा कंपनीचे खाजगीकरण यासह मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाचा आपला मानस स्पष्ट केला होता. उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचा आपला हेतू त्यांनी स्पष्ट केला होता. सामान्य विमा (General Insurance) कंपन्यांचे खाजगीकरण करण्यास परवानगी देणारा सामान्य विमा व्यवसाय (राष्ट्रीयकरण) सुधारणा कायदा २०२१ ऑगस्ट २०२१ मध्ये संसदेने मंजूर केला. सुधारित कायद्याने केंद्र सरकारने विशिष्ट विमा कंपनीमध्ये किमान ५१% इक्विटी भांडवल ठेवण्याची आवश्यकता वगळली. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांमध्ये अधिक खाजगी सहभागाला परवानगी देणे आणि विमा प्रवेश आणि सामाजिक संरक्षण वाढवणे, यासह इतर उद्दिष्टांची तरतूद केली.


विम्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि प्रवेश वाढवण्यासाठी परदेशातील नवीन कंपन्यांना प्रवेश मिळावा यासाठी, सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात विमा क्षेत्रात एफडीआय मर्यादा सध्याच्या ७४% १००% करण्यासाठी एक विधेयक मांडले होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात १५ कामकाजाचे दिवस असतील.

Comments
Add Comment

घरगुती गुंतवणूकदारांची सत्वपरीक्षा ! शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टीत घसरण 'या,' जागतिक कारणांमुळे

मोहित सोमण : आजही इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात अपेक्षित घसरण कायम राहिली असून सेन्सेक्स

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

बुमराह परतणार पण अक्षर पटेल नाही खेळणार, टीम इंडिया चिंतेत

धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला

महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा, राज्यात कुठे होणार युती आणि कुठे मैत्रीपूर्ण लढती ?

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या

भाजपचा शरद पवार गटाला मोठा धक्का

धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या